शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले; राहुल गांधी यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 20:12 IST

आळंंद  ( कर्नाटक ) : राफेलचा परस्पर सौदा व त्यातील ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा, शेतकºयांच्या कर्जमाफीचे, बेरोजगार तरुणांच्या ...

ठळक मुद्देराहुल गांधींची कलबुरगीत सभाकाँग्रेसच नागरिकांना न्याय देवू शकेल - राहुल गांधी

आळंंद  (कर्नाटक) : राफेलचा परस्पर सौदा व त्यातील ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा, शेतकºयांच्या कर्जमाफीचे, बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचे गाजर, नोटबंदीमुळे तसेच जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक व मध्यम व्यापारी नुकसानीत आले आहेत. विम्याच्या माध्यमातून हजारो कोटींचा घोटाळा प्रकरणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. काँग्रेसच आगामी काळात शेतकरी व देशातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊ शकेल असे आश्वासक उद्गार अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी कलबुरगी येथे काँग्रेसच्या परिवर्तन  रॅलीमध्ये बोलताना काढले.

             पंतप्रधान मोदींच्या कार्यपध्दतीवर कडाडून टीकाप्रहार करताना राहुल गांधी म्हणाले, मोदी हे २०१४ च्या निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देत सत्तेवर आले, पण आजपावेतो त्यांनी एकाही आश्वासनांची पूर्तता केली नाही. राफेल करारात मोठा  घोटाळा केला. फ्रान्सच्या अध्यक्षांनीच राफेलच्या कराराचे वास्तव उघडे केले आहे. भारत सरकारची एचएएल कंपनी असताना अननुभवी अनिल अंबानीना राफेलचे कंत्राट दिलेच कसे? असा सवाल केला. 

कॉंग्रेस संसदीय पक्षाचे नेते व कलबुरगी मतदार संघाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत आम्ही दिलेली आश्वासने पाळली आहेत व यापुढेही शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू असे उद्गार काढले. मोदींनी उद्घाटन केलेल्या योजना आमच्या काळातीलच आहेत,पण श्रेय मात्र ते घेत आहेत असे खरगे म्हणाले.-------काँग्रेसने आश्वासने पाळलीगरजू शेतकºयांची कर्जे माफ करण्याऐवजी मोदी यांनी उद्योगपतींची ३ लाख १५ हजार कोटींची कर्जे माफ केली.  बेरोजगार तरुणांना वर्षाकाठी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, पण गेल्या पाच वर्षांत फक्त २७ लाख जणांनाच रोजगारच मिळू शकला. नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येण्याऐवजी सर्वसामान्यांना बाहेर ताटकळत ठेऊन आतल्या दारातून काळ्याबाजारवाल्यांचा पैसा मात्र पांढरा केला गेला. हे सर्व आजच्या तरुणाईला व सर्वसामान्य जनतेला कळायला हवे.

आम्ही आजपर्यंत जी आश्वासने दिली आहेत ती पाळली आहेत.  २००९ मध्ये कलबुरगी येथे आम्ही दिलेले ३७१( जे) कलम लागू करण्याचे आश्वासन पाळले असून, त्यामुळेच या मागास भागातील तरुणांना उच्च शिक्षण प्रवेशामध्ये व नोकरी मिळवण्यामध्ये सवलती मिळत आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरKarnatakकर्नाटकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाRafale Dealराफेल डीलNote Banनोटाबंदी