मुलाचा पराभव जिव्हारी लागला
By Admin | Updated: July 20, 2014 01:09 IST2014-07-20T01:09:56+5:302014-07-20T01:09:56+5:30
लोकसभा निवडणुकीत आम्ही जिल्ह्यात केलेली सर्व कामे या मोदी लाटेने धुऊन गेली. माङया मुलाचा पराभव झाला. तो जिव्हारी लागला आहे,

मुलाचा पराभव जिव्हारी लागला
कणकवली (जि़ सिंधुदुर्ग) : लोकसभा निवडणुकीत आम्ही जिल्ह्यात केलेली सर्व कामे या मोदी लाटेने धुऊन गेली. माङया मुलाचा पराभव झाला. तो जिव्हारी लागला आहे, अशी खदखद व्यक्त करत तुम्ही सगळे पाठीशी असाल तर मोदी लाटही थोपविण्याची माङयात क्षमता आहे, असा दावा उद्योगमंत्री नारायण राणो यांनी येथील सभेत शनिवारी केला.
राणो शुक्रवारपासून कोकणच्या दौ:यावर आहेत. शनिवारी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये कार्यकत्र्याच्या गाठीभेटी घेतल्या. राजीनाम्याबाबतची पाश्र्वभूमी लोकांना समजावून सांगत, आपल्या पाठीशी राहण्याची भावनिक साद घातली. राणो म्हणाले, कॉँग्रेसमध्येही नऊ वर्षे प्रामाणिकपणो काम केले. मात्र, हायकमांडने सहा महिन्यांत मुख्यमंत्री करतो हे दिलेले आश्वासन आतार्पयत पाळले नाही. मुख्यमंत्रिपदाचा मला सोस नाही. मात्र, माङो कर्तृत्व राज्याच्या कामी यावे यासाठी मला मुख्यमंत्रिपद हवे होते. माङया राजीनाम्याच्या वृत्ताने महाराष्ट्रातील नेते हादरले आहेत, असेही राणो म्हणाले. (प्रतिनिधी)
च्मी सिंधुदुर्गातून विधानसभा निवडणुकीला उभा राहिलोच तर सावंतवाडी मतदारसंघातून लढेन. मात्र, आमच्या पक्षातीलच इच्छुक नाराज होतील, असे सांगून ही बाब गमतीने घ्या, असेही राणो म्हणाले.
कोणत्याही पदाची लालसा नाही
माङो हे बंड नाही किंवा कोणत्या पक्षातही जाणार नाही. पण मला काँग्रेसने जी कमिटमेंट दिली होती ती पूर्ण झालेली नाही. काँग्रेसने सहा महिन्यात मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्यापपयर्ंत त्याची पूर्ती केलेली नाही. मला प्रचार समिती अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष या दोन्ही पदांची लालसा नाही, अशी स्पष्टोक्ती उद्योगमंत्री नारायण राणो यांनी शनिवारी सावंतवाडीत दिली.
राजीनामा देणार म्हटल्यावर अन्य पक्षातील कोणी माङयाशी संपर्क केला नसल्याचा खुलासाही यावेळी त्यांनी केला. ते म्हणाले, आमदार केसरकर यांनी माङयावर विनाकारण टीका सुरू केली आहे. ही टीका थांबली नाही तर मी गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी केसरकर यांना दिला. राजीनामा दिल्यानंतर जर मला पक्षश्रेष्ठीनी दिल्लीत चर्चेसाठी बोलावले तर मी नक्की जाईन. तसेच मुख्यमंत्री माङयाबरोबर चर्चा करत असतील तरीही चर्चा करेन, असेही यावेळी त्यांनी जाहीर केले