शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या मनाईनंतरही मंत्रालयात बाटलीबंद पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:08 IST

शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा वापर करू नका, असे निर्देश केंद्र शासनाने दिले असतानाही, थेट मंत्रालयापासून तर राज्यभरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा राजरोस वापर केला जात आहे.

- गणेश देशमुखमुंबई : शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा वापर करू नका, असे निर्देश केंद्र शासनाने दिले असतानाही, थेट मंत्रालयापासून तर राज्यभरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा राजरोस वापर केला जातआहे.२३ मार्च २०१८ रोजी लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदी अधिसूचनेच्या अनुशंगाने प्लॅस्टिक कचरानिर्मिती थांबविण्याच्या केंद्र शासनाच्या प्रयत्नांना शासकीय यंत्रणेद्वारेच दिला जाणारा ‘खो’ रोखणार तरी कोण, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.मंत्रालय आणि विधानभवनात बाटलीबंद पाण्याचा वापर सातत्याने केला जातो. अधिवेशन काळातही तो उघडपणे केला गेला. मंत्र्यांची दालने, आयएएस अधिकाऱ्यांचे कक्ष, राजकीय पक्षांची दालने या ठिकाणी बाटलीबंद पाण्याचा होत असलेला वापर नवा नाही. राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयातच केंद्र शासनाची सूचना बेदखल केलीजात असल्याचे पाहायला मिळत आहे.‘बाटलीबंद पाण्याच्या वापरावर निर्बंध आणणे’ या विषयांतर्गत केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने २८ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट शब्दांत बाटलीबंद पाणी न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाचे अवर सचिव सरस्वती प्रसाद यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या या पत्रानुसार, भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने शासकीय बैठकांमध्ये बाटलीबंद पाण्याचा वापर पूर्णत: बंद केला आहे. महाराष्ट्र शासनानेही शासकीय बैठका, सेमिनार, कॉन्फरन्सेस, वर्कशॉप आदी ठिकाणी बाटलीबंद पाण्याचा वापर करू नये. त्याऐवजी प्लॅस्टिक कचºयाची निर्मिती होणार नाही,या पद्धतीने शुद्ध व स्वच्छपेयजलाची व्यवस्था करावी, असे सूचविले आहे.प्लॅस्टिकचा कचरामंत्रालयासह राज्यभरातील सरकारी कार्यालयांमध्ये २०० मिलीलीटरच्या पेयजलाच्या बाटल्या वापरल्या जातात. त्यामुळे प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMantralayaमंत्रालय