शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

केंद्राच्या मनाईनंतरही मंत्रालयात बाटलीबंद पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:08 IST

शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा वापर करू नका, असे निर्देश केंद्र शासनाने दिले असतानाही, थेट मंत्रालयापासून तर राज्यभरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा राजरोस वापर केला जात आहे.

- गणेश देशमुखमुंबई : शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा वापर करू नका, असे निर्देश केंद्र शासनाने दिले असतानाही, थेट मंत्रालयापासून तर राज्यभरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा राजरोस वापर केला जातआहे.२३ मार्च २०१८ रोजी लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदी अधिसूचनेच्या अनुशंगाने प्लॅस्टिक कचरानिर्मिती थांबविण्याच्या केंद्र शासनाच्या प्रयत्नांना शासकीय यंत्रणेद्वारेच दिला जाणारा ‘खो’ रोखणार तरी कोण, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.मंत्रालय आणि विधानभवनात बाटलीबंद पाण्याचा वापर सातत्याने केला जातो. अधिवेशन काळातही तो उघडपणे केला गेला. मंत्र्यांची दालने, आयएएस अधिकाऱ्यांचे कक्ष, राजकीय पक्षांची दालने या ठिकाणी बाटलीबंद पाण्याचा होत असलेला वापर नवा नाही. राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयातच केंद्र शासनाची सूचना बेदखल केलीजात असल्याचे पाहायला मिळत आहे.‘बाटलीबंद पाण्याच्या वापरावर निर्बंध आणणे’ या विषयांतर्गत केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने २८ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट शब्दांत बाटलीबंद पाणी न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाचे अवर सचिव सरस्वती प्रसाद यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या या पत्रानुसार, भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने शासकीय बैठकांमध्ये बाटलीबंद पाण्याचा वापर पूर्णत: बंद केला आहे. महाराष्ट्र शासनानेही शासकीय बैठका, सेमिनार, कॉन्फरन्सेस, वर्कशॉप आदी ठिकाणी बाटलीबंद पाण्याचा वापर करू नये. त्याऐवजी प्लॅस्टिक कचºयाची निर्मिती होणार नाही,या पद्धतीने शुद्ध व स्वच्छपेयजलाची व्यवस्था करावी, असे सूचविले आहे.प्लॅस्टिकचा कचरामंत्रालयासह राज्यभरातील सरकारी कार्यालयांमध्ये २०० मिलीलीटरच्या पेयजलाच्या बाटल्या वापरल्या जातात. त्यामुळे प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMantralayaमंत्रालय