शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सीमा प्रश्न कौरव-पांडवांचे युद्ध नाही : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 05:28 IST

महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्यातील गट-तट संपविले पाहिजेत. गट-तट जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा लढा तीव्र होणार नाही.

बेळगाव - सीमा प्रश्न म्हणजे कौरव-पांडवांचे युद्ध नाही, दोन्ही बाजूला पांडवच आहेत. देशामध्ये भाषा-भाषांमध्ये वाद असू नयेत. या ठिकाणी भाषेचा आणि संस्कृतीचा वाद आहे; मात्र या प्रश्नी न्यायालयच निर्णय देईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केले.बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित बॅ नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. हा कार्यक्रम गोगटे रंगमंदिरमध्ये झाला. संजय राऊत म्हणाले, सध्या सीमाप्रश्नाचा लढा न्यायालयात आहे. हा लढा उत्तम प्रकारे लढायला पाहिजे. टोकाचा संघर्ष न करता मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणतीही भाषा, संस्कृती टिकविणे ही प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे. भाषेला शत्रू न मानता त्याचा विकास करण्याचा प्र्रयत्न केला पाहिजे. देशामध्ये भाषा-भाषांमध्ये वाद असू नयेत. या ठिकाणी भाषेचा आणि संस्कृतीचा वाद आहे; मात्र या प्रश्नी न्यायालयच निर्णय देईल.महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्यातील गट-तट संपविले पाहिजेत. गट-तट जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा लढा तीव्र होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही अशीच भूमिका आहे, असेही राऊत म्हणाले. सरकार चालविण्यासाठी धर्माचा आधार घेऊ नये. धर्माचा आधार घेतला तर हिंदुस्थानचा पाकिस्तान, इराण व्हायला वेळ लागणार नाही. आमचं हिंदुत्व गाडगे महाराजांचे आहे. तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला अन्न आणि हवा असलेल्याला निवारा अशी गाडगे महाराजांची जी भूमिका होती तीच आम्ही पुढे घेऊन चाललोय.कडेकोट बंदोबस्त;राऊत यांचे उत्स्फूर्त स्वागतसंजय राऊत यांच्या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात व कार्यक्रमस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी मराठीतच बोलतोसंजय राऊत म्हणाले, भाषा वाद जरी झाला असला तरी भाषेचा वाद असू नये. कारण आपला देश एकच आहे. कानडी बांधव महाराष्ट्रात जिथ- जिथे राहतात तिथे कानडी शाळांना अनुदान देण्याचे काम आमचे सरकार (महाविकास आघाडीचे) करीत आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आजही आम्ही शुद्ध मराठीतच बोलतो.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbelgaonबेळगावmarathiमराठीKarnatakकर्नाटक