शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

सीमा प्रश्न कौरव-पांडवांचे युद्ध नाही : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 05:28 IST

महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्यातील गट-तट संपविले पाहिजेत. गट-तट जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा लढा तीव्र होणार नाही.

बेळगाव - सीमा प्रश्न म्हणजे कौरव-पांडवांचे युद्ध नाही, दोन्ही बाजूला पांडवच आहेत. देशामध्ये भाषा-भाषांमध्ये वाद असू नयेत. या ठिकाणी भाषेचा आणि संस्कृतीचा वाद आहे; मात्र या प्रश्नी न्यायालयच निर्णय देईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केले.बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित बॅ नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. हा कार्यक्रम गोगटे रंगमंदिरमध्ये झाला. संजय राऊत म्हणाले, सध्या सीमाप्रश्नाचा लढा न्यायालयात आहे. हा लढा उत्तम प्रकारे लढायला पाहिजे. टोकाचा संघर्ष न करता मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणतीही भाषा, संस्कृती टिकविणे ही प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे. भाषेला शत्रू न मानता त्याचा विकास करण्याचा प्र्रयत्न केला पाहिजे. देशामध्ये भाषा-भाषांमध्ये वाद असू नयेत. या ठिकाणी भाषेचा आणि संस्कृतीचा वाद आहे; मात्र या प्रश्नी न्यायालयच निर्णय देईल.महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्यातील गट-तट संपविले पाहिजेत. गट-तट जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा लढा तीव्र होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही अशीच भूमिका आहे, असेही राऊत म्हणाले. सरकार चालविण्यासाठी धर्माचा आधार घेऊ नये. धर्माचा आधार घेतला तर हिंदुस्थानचा पाकिस्तान, इराण व्हायला वेळ लागणार नाही. आमचं हिंदुत्व गाडगे महाराजांचे आहे. तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला अन्न आणि हवा असलेल्याला निवारा अशी गाडगे महाराजांची जी भूमिका होती तीच आम्ही पुढे घेऊन चाललोय.कडेकोट बंदोबस्त;राऊत यांचे उत्स्फूर्त स्वागतसंजय राऊत यांच्या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात व कार्यक्रमस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी मराठीतच बोलतोसंजय राऊत म्हणाले, भाषा वाद जरी झाला असला तरी भाषेचा वाद असू नये. कारण आपला देश एकच आहे. कानडी बांधव महाराष्ट्रात जिथ- जिथे राहतात तिथे कानडी शाळांना अनुदान देण्याचे काम आमचे सरकार (महाविकास आघाडीचे) करीत आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आजही आम्ही शुद्ध मराठीतच बोलतो.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbelgaonबेळगावmarathiमराठीKarnatakकर्नाटक