शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 05:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण, नाशिक येथे सभा तर मुंबईत रोड शो, धर्माधारित बजेटवरून विरोधकांवर टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई/कल्याण/नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अखेरच्या टप्प्यात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण व नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सभा झाल्या, तर मुंबईतील घाटकोपरमध्ये त्यांनी रोड शो केला. नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांच्या तोंडातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल पाच गौरवपर वाक्ये वदवून घ्यावी, असे आव्हान मोदींनी कल्याणमधील सभेत दिले. तर नाशिकच्या सभेत त्यांनी कांदा आणि द्राक्ष पिकांच्या मुद्द्याला हात घालत ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार असल्याची घोषणा केली.

दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि नाशिक मतदारसंघातील हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे तर, कल्याण व भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुक्रमे श्रीकांत शिंदे, कपिल पाटील यांच्या प्रचाराकरिता कल्याणमधील व्हर्टेक्स मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील इतर नेते उपस्थित होते. 

सत्ता स्थापन झाल्यावर १०० दिवसांत काय करायचे याची ब्लू प्रिंट माझ्याकडे आहे. देशातील तरुणांकडे विकासाच्या नवनवीन कल्पना असल्याने त्यांनी त्या आपल्याला कळवाव्या. १२५ दिवसांत आपण नियोजन करून २०४७ सालाच्या पूर्वीच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

‘ऑपरेशन ग्रीन’ पुनश्च राबविण्याची घोषणा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथील सभेत पंतप्रधान मोदी यांनी कांदा प्रश्नाविषयीची भूमिका स्पष्ट केली. ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत कांदा वाहतुकीवर सबसिडी देण्याचे मिशन पुन्हा सुरू केले जाणार असून, क्लस्टर विकास आराखड्याचाही द्राक्ष पिकाला फायदा होईल, असे ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांत कांदा निर्यातीत ३५ टक्के इतकी वाढ झाली असून निर्यात बंदी उठविल्यानंतर २२ हजार मेट्रिक टन पेक्षा अधिक निर्यात झाल्याचे त्यांनी सांगितले. यंदा ५ लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच केंद्राने प्रथमच बफर स्टॉक बनविण्याची व्यवस्था उभी केली. यापूर्वीच्या सरकारमध्ये अशी व्यवस्था नव्हती, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.  

ट्वेन्टी फोर बाय सेव्हन फॉर ट्वेन्टी फोर्टी सेव्हन...  

देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पुढील पाच वर्षांत कोणते निर्णय घ्यायचे याबाबत देशातील तरुणांनी पुढील १२५ दिवसांत मला सूचना कराव्या. भारताला २०४७ पूर्वीच विकसित राष्ट्र करण्याकरिता ट्वेन्टी फोर बाय सेव्हन काम करणार आहे, असा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी कल्याणच्या सभेत व्यक्त केला.

मुस्लीम तुष्टीकरणाची काँग्रेस प्रयोगशाळा  

मोदी म्हणाले की, काँग्रेस नेहमीच मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे राजकारण करीत आली आहे. यूपीए सरकारने मुस्लिमांकरिता १५ टक्के बजेट तयार केले होते. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. धर्माधारित बजेटला सगळ्यात प्रथम मी विरोध केला. कर्नाटक ही काँग्रेसची मुस्लीम तुष्टीकरणाची प्रयोगशाळा असल्याचा उल्लेख त्यांनी केला.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीMahayutiमहायुतीBJPभाजपा