शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

शहरांच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’

By admin | Updated: August 22, 2014 01:39 IST

देशात झपाट्याने शहरीकरण होत आहे. हे संकट मानायचे, आव्हान मानायचे की एक संधी मानायची, हे ठरविले पाहिजे. आजवर शहरीकरण हे एक संकट मानले जात होते. यापूर्वी देशात विकासाचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प : मेट्रो रेल्वे व पारडी उड्डाणपुलाचे भूमिपूजन नागपूर : देशात झपाट्याने शहरीकरण होत आहे. हे संकट मानायचे, आव्हान मानायचे की एक संधी मानायची, हे ठरविले पाहिजे. आजवर शहरीकरण हे एक संकट मानले जात होते. यापूर्वी देशात विकासाचे नियोजन झाले नाही. वाढती लोकसंख्या, वाहतूक, नागरी सुविधांचा विचार केला गेला नाही. आता मात्र शहरीकरण ही एक संधी मानून शहरांच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली जाईल, असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.कस्तूरचंद पार्क येथे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प व पारडी उड्डाणपुलाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय शहरी विकास मंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, महापौर आ. अनिल सोले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, नगरविकास सचिव शंकर अग्रवाल, नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त श्याम वर्धने उपस्थित होते. कार्यक्रम शासकीय असला तरी समोर हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाला जाहीर सभेचे स्वरूप आले. मोदी हे नागपुरात पहिल्यांदाच एखाद्या जाहीर कार्यक्रमात बोलणार होते. त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्सुकता होती. मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात करीत उपस्थितांची मने जिंकली. सुरुवातीलाच त्यांनी नागपूरचा गौरव केला. ते म्हणाले, नागपूर ही संत्रानगरी आहे. शून्य मैलाचे शहर आहे. आता आम्ही या शहराला ‘मेट्रो सिटी’ अशी नवी ओळख देणार आहोत. नागपूर हे विदर्भाचे आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने येथे मेट्रो रेल्वे सुरू करण्यास प्राधान्य दिले. मेट्रो रेल्वे हा एक ‘स्टेटस्सिम्बॉल’ आहे. आता देशाच्या नकाशावर आधुनिक शहरांमध्ये नागपूरचेही नाव येईल. बदलत्या काळात पर्यावरण संवर्धन ही नैतिक जबाबदारी आहे. लोकसंख्या वाढली की वाहने वाढतात. वाहतुकीची समस्या निर्माण होते. प्रदूषणात वाढ होते. त्यासाठी एकाच वेळी हजारो लोकांना प्रवास करता यावा, अशी व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. त्यासाठीच मोठ्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ंशहरीकरणाच्या गतीने १०० स्मार्ट सिटी करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यात अशी पाच ते सहा शहरे व्हावी. तेथे आर्थिक उलाढाल, तंत्रज्ञानाच्या सुविध उपलब्ध व्हाव्यात या दिशेने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ५०० शहरांमध्ये कचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मोदींनी त्यांच्या भाषणात सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला. ते म्हणाले, आपण सिंगापूर, दुबईत जातो व तेथील स्वच्छतेचे गोडवे गातो. येथे मात्र आपण कचरा करतो. महात्मा गांधींनी पाहिलेले स्वच्छतेचे स्वप्न आपल्याला साकारायचे आहे. यासाठी देशातील ५०० लहानमोठी शहरांची निवड करून तेथे पीपीपी मॉडेलवर घनकचरा व्यवस्थापन व सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचे अभियान राबवायचे आहे. कचऱ्यापासून कंचन बनविण्याचा विडा उचला. शहर स्वच्छ होईल. गोळा झालेल्या कचऱ्यापासून सेंद्रीय खत, वीज, गॅस मिळेल. हे खत गावातील शेतीसाठी द्या. शहरातील सांडपाणी स्वच्छ करून ते शेतीसाठी गावकऱ्यांना द्या. ही व्यवस्था आपल्याला विकसित करायची आहे. केंद्र सरकार लवकरच यासाठी योजना घेऊन येत आहे. नगरपालिका व महापालिकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.