शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, भाजपाची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 20:26 IST

आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवला दाखवण्याचा केविलवाणा असल्याचे महाराष्ट्र भाजपाने म्हटले आहे. 

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल झाली. नंदुरबारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी न्याय संमेलनाला राहुल गांधी यांनी संबोधित केले. यावेळी आदिवासी हेच देशाचे खरे मालक आहेत, असे सांगत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. या टीकेला महाराष्ट्र भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवला दाखवण्याचा केविलवाणा असल्याचे महाराष्ट्र भाजपाने म्हटले आहे. 

यासंदर्भात भाजपाने महाराष्ट्र भाजपाने ट्विट करत याला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात येऊन आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवळा दाखवणारे घराणेशाहीचे ‘फेल प्रॉडक्ट’ राहुल गांधी जातीवाद गरळ ओकत आहेत. याच राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाने आदिवासी समाजातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पावलोपावली अपमान आणि विरोध केला. काँग्रेसने नेहमी बिरसा मुंडा यांच्यासारख्या अनेक आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. फक्त एकच कुटुंब आणि त्यांचे युवराज एवढेच मर्यादित असलेले हे ‘फेल प्रोडक्ट’ आज आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, असा आरोप महाराष्ट्र भाजपाने केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने आज, मंगळवारी गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केला. नंदुरबारमध्ये झालेल्या सभेत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. यावेळी आदिवासी हे देशाचे खरे मालक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. आदिवासींसाठी भाजपाकडून वनवासी या शब्दाचा वापर केला जातो, असे देखील ते म्हणाले. इथं कोणी नव्हतं त्यावेळी आदिवासी भारतात होते, तुम्ही खरे मालक आहात. जल, जंगल, जमीन याशिवाय भारतातील धन संपत्तीचे खरे मालक आदिवासी होते, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

वनवासी या शब्दाचा अर्थ जंगलात राहणारा असा होतो. वनवासी आणि आदिवासी यामध्ये फरक आहे. आदिवासी शब्दासह जमीन, जल, जंगलाचा अधिकार जोडलेला आहे. वनवासी शब्दात कोणताही अधिकार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, केंद्रातील मोदी सरकारने २० ते २५ अब्जाधीशांचे कर्ज किती माफ केले आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? १६ लाख कोटी रुपये अब्जाधीशांचे माफ केले आहे. नरेंद्र मोदी यांनी आदिवासी शेतकऱ्यांचे एक रुपयाचे कर्ज माफ केले आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. आदिवासी तरुणांचे शिक्षणाचे कर्ज माफ केले का? ज्यांना कर्जमाफीची गरज नाही, त्यांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले, असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस