शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आदिवासींबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, भाजपाची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 20:26 IST

आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवला दाखवण्याचा केविलवाणा असल्याचे महाराष्ट्र भाजपाने म्हटले आहे. 

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल झाली. नंदुरबारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी न्याय संमेलनाला राहुल गांधी यांनी संबोधित केले. यावेळी आदिवासी हेच देशाचे खरे मालक आहेत, असे सांगत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. या टीकेला महाराष्ट्र भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवला दाखवण्याचा केविलवाणा असल्याचे महाराष्ट्र भाजपाने म्हटले आहे. 

यासंदर्भात भाजपाने महाराष्ट्र भाजपाने ट्विट करत याला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात येऊन आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवळा दाखवणारे घराणेशाहीचे ‘फेल प्रॉडक्ट’ राहुल गांधी जातीवाद गरळ ओकत आहेत. याच राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाने आदिवासी समाजातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पावलोपावली अपमान आणि विरोध केला. काँग्रेसने नेहमी बिरसा मुंडा यांच्यासारख्या अनेक आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. फक्त एकच कुटुंब आणि त्यांचे युवराज एवढेच मर्यादित असलेले हे ‘फेल प्रोडक्ट’ आज आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, असा आरोप महाराष्ट्र भाजपाने केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने आज, मंगळवारी गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केला. नंदुरबारमध्ये झालेल्या सभेत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. यावेळी आदिवासी हे देशाचे खरे मालक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. आदिवासींसाठी भाजपाकडून वनवासी या शब्दाचा वापर केला जातो, असे देखील ते म्हणाले. इथं कोणी नव्हतं त्यावेळी आदिवासी भारतात होते, तुम्ही खरे मालक आहात. जल, जंगल, जमीन याशिवाय भारतातील धन संपत्तीचे खरे मालक आदिवासी होते, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

वनवासी या शब्दाचा अर्थ जंगलात राहणारा असा होतो. वनवासी आणि आदिवासी यामध्ये फरक आहे. आदिवासी शब्दासह जमीन, जल, जंगलाचा अधिकार जोडलेला आहे. वनवासी शब्दात कोणताही अधिकार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, केंद्रातील मोदी सरकारने २० ते २५ अब्जाधीशांचे कर्ज किती माफ केले आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? १६ लाख कोटी रुपये अब्जाधीशांचे माफ केले आहे. नरेंद्र मोदी यांनी आदिवासी शेतकऱ्यांचे एक रुपयाचे कर्ज माफ केले आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. आदिवासी तरुणांचे शिक्षणाचे कर्ज माफ केले का? ज्यांना कर्जमाफीची गरज नाही, त्यांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले, असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस