शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आदिवासींबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, भाजपाची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 20:26 IST

आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवला दाखवण्याचा केविलवाणा असल्याचे महाराष्ट्र भाजपाने म्हटले आहे. 

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल झाली. नंदुरबारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी न्याय संमेलनाला राहुल गांधी यांनी संबोधित केले. यावेळी आदिवासी हेच देशाचे खरे मालक आहेत, असे सांगत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. या टीकेला महाराष्ट्र भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवला दाखवण्याचा केविलवाणा असल्याचे महाराष्ट्र भाजपाने म्हटले आहे. 

यासंदर्भात भाजपाने महाराष्ट्र भाजपाने ट्विट करत याला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात येऊन आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवळा दाखवणारे घराणेशाहीचे ‘फेल प्रॉडक्ट’ राहुल गांधी जातीवाद गरळ ओकत आहेत. याच राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाने आदिवासी समाजातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पावलोपावली अपमान आणि विरोध केला. काँग्रेसने नेहमी बिरसा मुंडा यांच्यासारख्या अनेक आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. फक्त एकच कुटुंब आणि त्यांचे युवराज एवढेच मर्यादित असलेले हे ‘फेल प्रोडक्ट’ आज आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, असा आरोप महाराष्ट्र भाजपाने केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने आज, मंगळवारी गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केला. नंदुरबारमध्ये झालेल्या सभेत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. यावेळी आदिवासी हे देशाचे खरे मालक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. आदिवासींसाठी भाजपाकडून वनवासी या शब्दाचा वापर केला जातो, असे देखील ते म्हणाले. इथं कोणी नव्हतं त्यावेळी आदिवासी भारतात होते, तुम्ही खरे मालक आहात. जल, जंगल, जमीन याशिवाय भारतातील धन संपत्तीचे खरे मालक आदिवासी होते, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

वनवासी या शब्दाचा अर्थ जंगलात राहणारा असा होतो. वनवासी आणि आदिवासी यामध्ये फरक आहे. आदिवासी शब्दासह जमीन, जल, जंगलाचा अधिकार जोडलेला आहे. वनवासी शब्दात कोणताही अधिकार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, केंद्रातील मोदी सरकारने २० ते २५ अब्जाधीशांचे कर्ज किती माफ केले आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? १६ लाख कोटी रुपये अब्जाधीशांचे माफ केले आहे. नरेंद्र मोदी यांनी आदिवासी शेतकऱ्यांचे एक रुपयाचे कर्ज माफ केले आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. आदिवासी तरुणांचे शिक्षणाचे कर्ज माफ केले का? ज्यांना कर्जमाफीची गरज नाही, त्यांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले, असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस