शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

भाजपा ‘बेल आणि जेल’वाल्यांचा पक्ष -मल्लिकार्जुन खर्गे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 06:38 IST

भारतीय जनता पार्टी म्हणजे गुन्हेगारांचा पक्ष बनला आहे. गेल्या वर्षभरात सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रचंड वाढ झाली आहे.

मुंबई : भारतीय जनता पार्टी म्हणजे गुन्हेगारांचा पक्ष बनला आहे. गेल्या वर्षभरात सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रचंड वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला ‘बेल’गाडी म्हणाले होते, पण भाजपा तर ‘बेल’वरच्या आणि ‘जेल’मधल्या लोकांचा पक्ष बनला आहे, अशी टीका करीत, काँग्रेस सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भाजपावर निशाणा साधला. एरवी भाषणबाजी करणारे मोदी दलित आणि मुस्लीम अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर मात्र चकार शब्दही काढत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.महाराष्ट्राच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर खर्गे प्रथमच दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज दुसºया दिवशी खर्गे यांनी षण्मुखानंद सभागृहात मुंबई काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित केले. भाजपा सरकारच्या काळात दलित आणि अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. भाजपाशी संबंधित लोकच या गुन्ह्यांमध्ये पुढे आहेत. मात्र, सतत भाषण करणारे मोदी याबाबत चकार शब्द काढत नाहीत. मोदी फक्त स्वत:बद्दलच बोलत असतात. आता देशाला त्यांचे भाषण नको, राशन हवे असल्याचे खर्गे म्हणाले. नरेंद्र मोदी काँग्रेसला ‘बेल’गाडी बोलले, परंतु भाजपाचे काही लोक ‘बेल’वर आहेत, तर काही लोक जेलमध्ये आहेत, तर काही लोक बँकांतील पैसा घेऊन पळून गेले आहेत. ललित मोदी, नीरव मोदी देशाबाहेर पळून गेले आहेत. आता मोदीला सरकारला सत्तेतून बाहेर पाठवायची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी अंतर्गत मतभेद संपविण्याचे आवाहन करून खर्गे म्हणाले की, सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. छोटे-मोठे मतभेद विसरून कामाला लागा. आपल्याला स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी, स्वत:च्या संरक्षणासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसला विजयी करावे लागेल. त्यासाठी त्याग करायची तयारी पक्षातील नेत्यांनी ठेवायला हवी. काँग्रेस घराघरांत पोहोचविणे, ही काळाची गरज आहे. म्हणूनच ‘काँग्रेस आपल्या दारी’ ही मोहीम सुरू केली आहे.या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, माणिकराव ठाकरे, प्रदेश सहप्रभारी संपत कुमार, सोनल पटेल आणि आशिष दुआ यांच्यासह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, आजीमाजी खासदार व आमदार उपस्थित होते.भाजपाने त्यागाच्या गप्पा मारू नयेतराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता. भाजपाचे लोक स्वातंत्र्यासाठी कधीच तुरुंगात गेले नाहीत, याउलट काँग्रेसचे हजारो लोक स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनीही देशासाठी बलिदान दिले. संघ आणि भाजपामधील कोणीही असा त्याग केला नाही, पण आता हिच मंडळी देशाला त्याग शिकवायला निघाली आहेत, असा टोलाही खर्गे यांनी लगावला.निवडणुकांच्यातोंडावर हमीभावभाजपाला सरकार चालविता येत नाही. दोन वर्षांत एकट्या महाराष्ट्रात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. आता निवडणुका नऊ महिन्यांवर आल्यामुळेच शेतकरी हमीभाव जाहीर केला. गेल्या चार वर्षांत हा निर्णय का घेतला नाही, असा सवालही त्यांनी या वेळी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा