शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

२०२४ पूर्वी भाजपा पक्ष फुटेल; विधानसभा अध्यक्षांसह BJP वर संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 11:55 IST

भाजपाच्या नेतृत्वात सध्याचे एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडीची स्थापना झाली, पाटणा, बंगळुरूत बैठक झाली तोपर्यंत त्यांना एनडीएची आठवण झाली नव्हती असा आरोप राऊतांनी केला.

मुंबई – विधानसभा अध्यक्षांवर आम्ही दबाव आणत नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. विधानसभा अध्यक्षांनी घटनेनुसार शपथ घेतली. त्याआधी वकील म्हणून सनद घेतलीय. त्यांच्या कारकिर्दीत गेल्या १ वर्षापासून घटनेचा, कायद्याचा महाराष्ट्रात खून होताना दिसतोय. त्यावर विधानसभा अध्यक्षांना काय वाटत नसेल तर विधिमंडळाच्या इतिहासात काळ्याकुट्ट पानावर त्यांचे नाव लिहिले जाईल. जनतेच्या न्यायालयात याबद्दल रोष आहे. त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटावर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यांवर राजीनामा दिला, भाजपाकडे नितीमत्ता आणि नैतिकता थोडीही शिल्लक असेल तर ते या १६ आमदारांच्या अपात्रेवर निर्णय घेतील. आपलीच लोकं सोडून जातायेत हे उद्धव ठाकरेंना कळाले तेव्हा त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी का जाऊ, विधानसभेत आटापिटा का करू याला नैतिकता म्हणतात. ती उद्धव ठाकरेंकडे होती. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना ज्या गोष्टीत कल्याण वाटते. त्यांचे २०२४ च्या निवडणुकीत अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच भाजपाच्या नेतृत्वात सध्याचे एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडीची स्थापना झाली, पाटणा, बंगळुरूत बैठक झाली तोपर्यंत त्यांना एनडीएची आठवण झाली नव्हती. मग त्यांनी इकडून तिकडून लोकं गोळा करून दिल्लीत एनडीए म्हणून बैठक घेतली. शिवसेना-अकाली दल नसेल तर एनडीएची ताकद शून्य आहे. आम्हीच नाही, बाकी लोकं येतात आणि जातात, एनडीए अस्तित्वात नाही. एनडीएत आज जे चित्र दिसतेय ते राहतेय की नाही ही शंका आहे. इतकेच नाही तर २०२४ पूर्वी भाजपा पक्षही फुटलेला असेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला.

दरम्यान, सनातन धर्माला कुणी मुळासकट उखडून टाकू शकत नाही. सनातन धर्म या देशात आणि जगात कायम राहील. AIDMK हेदेखील सनातन धर्माविरोधात होते. आम्ही सर्व मजबुतीने सनातन धर्मासाठी काम करू, मोदींना चिंता करण्याचे कारण नाही. भाजपाने सनातन धर्माच्या संरक्षणाचा ठेका घेतला नाही. इथं शिवसेना बसलीय, आम्ही काम करू, धर्माच्या रक्षणासाठी आम्हाला कुणी अडवू शकत नाही. हा निवडणुकीचा मुद्दा नाही. सनातन धर्माची तुम्हाला अचानक चिंता लागली आहे. २०२४ साठी भाजपा आणि मोदींकडे काही मुद्दा नाही. महागाई, बेरोजगारी, चीन घुसखोरी हे मुद्दे आहेत. राष्ट्रीय सुरक्षा, कॅनडा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. परंतु सनातन धर्माचा मुद्दा उचलला जातोय. प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे असंही मत संजय राऊतांनी सडेतोड मांडले.

 

 

 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना