शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

२०२४ पूर्वी भाजपा पक्ष फुटेल; विधानसभा अध्यक्षांसह BJP वर संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 11:55 IST

भाजपाच्या नेतृत्वात सध्याचे एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडीची स्थापना झाली, पाटणा, बंगळुरूत बैठक झाली तोपर्यंत त्यांना एनडीएची आठवण झाली नव्हती असा आरोप राऊतांनी केला.

मुंबई – विधानसभा अध्यक्षांवर आम्ही दबाव आणत नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. विधानसभा अध्यक्षांनी घटनेनुसार शपथ घेतली. त्याआधी वकील म्हणून सनद घेतलीय. त्यांच्या कारकिर्दीत गेल्या १ वर्षापासून घटनेचा, कायद्याचा महाराष्ट्रात खून होताना दिसतोय. त्यावर विधानसभा अध्यक्षांना काय वाटत नसेल तर विधिमंडळाच्या इतिहासात काळ्याकुट्ट पानावर त्यांचे नाव लिहिले जाईल. जनतेच्या न्यायालयात याबद्दल रोष आहे. त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटावर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यांवर राजीनामा दिला, भाजपाकडे नितीमत्ता आणि नैतिकता थोडीही शिल्लक असेल तर ते या १६ आमदारांच्या अपात्रेवर निर्णय घेतील. आपलीच लोकं सोडून जातायेत हे उद्धव ठाकरेंना कळाले तेव्हा त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी का जाऊ, विधानसभेत आटापिटा का करू याला नैतिकता म्हणतात. ती उद्धव ठाकरेंकडे होती. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना ज्या गोष्टीत कल्याण वाटते. त्यांचे २०२४ च्या निवडणुकीत अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच भाजपाच्या नेतृत्वात सध्याचे एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडीची स्थापना झाली, पाटणा, बंगळुरूत बैठक झाली तोपर्यंत त्यांना एनडीएची आठवण झाली नव्हती. मग त्यांनी इकडून तिकडून लोकं गोळा करून दिल्लीत एनडीए म्हणून बैठक घेतली. शिवसेना-अकाली दल नसेल तर एनडीएची ताकद शून्य आहे. आम्हीच नाही, बाकी लोकं येतात आणि जातात, एनडीए अस्तित्वात नाही. एनडीएत आज जे चित्र दिसतेय ते राहतेय की नाही ही शंका आहे. इतकेच नाही तर २०२४ पूर्वी भाजपा पक्षही फुटलेला असेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला.

दरम्यान, सनातन धर्माला कुणी मुळासकट उखडून टाकू शकत नाही. सनातन धर्म या देशात आणि जगात कायम राहील. AIDMK हेदेखील सनातन धर्माविरोधात होते. आम्ही सर्व मजबुतीने सनातन धर्मासाठी काम करू, मोदींना चिंता करण्याचे कारण नाही. भाजपाने सनातन धर्माच्या संरक्षणाचा ठेका घेतला नाही. इथं शिवसेना बसलीय, आम्ही काम करू, धर्माच्या रक्षणासाठी आम्हाला कुणी अडवू शकत नाही. हा निवडणुकीचा मुद्दा नाही. सनातन धर्माची तुम्हाला अचानक चिंता लागली आहे. २०२४ साठी भाजपा आणि मोदींकडे काही मुद्दा नाही. महागाई, बेरोजगारी, चीन घुसखोरी हे मुद्दे आहेत. राष्ट्रीय सुरक्षा, कॅनडा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. परंतु सनातन धर्माचा मुद्दा उचलला जातोय. प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे असंही मत संजय राऊतांनी सडेतोड मांडले.

 

 

 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना