शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

भाजपाच्या रहाटकर माघार घेणार, बिनविरोध निवड अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:45 AM

सहा जागांसाठी होणाºया राज्यसभा निवडणुकीत भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली असली तरी, रहाटकर माघार घेणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

मुंबई : सहा जागांसाठी होणाºया राज्यसभा निवडणुकीत भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली असली तरी, रहाटकर माघार घेणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.भाजपातर्फे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आधीच अर्ज भरला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि केरळचे माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदींच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्याचवेळी भाजपाने विजया रहाटकर यांचाही अर्ज भरल्याने राजकीय कुजबुज सुरू झाली.रहाटकर यांना भाजपाने नेमके कशासाठी उभे केले? काँग्रेसचे उमेदवार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची वाट रोखली जाणार का, असे तर्कवितर्क सुरू झाले. शिवसेनेची अतिरिक्त मते, अपक्ष आमदार आणि लहान पक्षांच्या आमदारांची मते घेऊन भाजपा रहाटकरांना जिंकविण्यासाठी प्रयत्न करेल, असे गणितदेखील मांडले गेले.तथापि, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, रहाटकर माघार घेतील. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने विरोधकांवर दबाव म्हणूनदेखील रहाटकर यांचा अर्ज भरला गेला असण्याची शक्यता आहे. विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या या जागांसाठी मतदान हे खुले असते. गुप्त मतदान असले तर घोडेबाजाराला वाव असतो. खुल्या मतदानामुळे मतांची उघड फोडाफोडी भाजपा करणार नाही आणि निवडणुकीत घोडेबाजार केल्याचा आरोप स्वत:वर लादून घेणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे रहाटकर या अर्ज मागे घेतील.>रहाटकरांचा अर्ज कशासाठी?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी भाजपाच्या विधिमंडळ कार्यालयात आले आणि विजया रहाटकर यांचाही अर्ज आपल्याला भरायचा आहे, असे त्यांनी सांगितले. त्याआधीच रहाटकर यांना निरोप देण्यात आला होता. व्ही. मुरलीधरन हे केरळमधून अर्ज भरण्यासाठी आलेले होते. अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे त्यांनी आणली होती पण काही जोडपत्रे यावयाची होती. ती शेवटच्या क्षणापर्यंत आली. उद्या एखादे कागदपत्र राहून गेले म्हणून त्यांचा अर्ज रद्द झाला तर पर्यायी व्यवस्था म्हणून रहाटकर यांचा अर्ज भरण्यात आल्याचे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून १५ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल.>केतकरांचा अर्ज दाखलच्काँग्रेसतर्फे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी महाराष्ट्राचे पक्षप्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. गणपतराव देशमुख, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी, प्रा. जोगेंद्र कवाडे आदी नेते उपस्थित होते.राष्टÑवादी काँग्रेसने वंदना चव्हाण आणि शिवसेनेने अनिल देसाई यांनापुन्हा संधी दिली असून या दोघांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :Vijaya Rahatkarविजया रहाटकर