शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

भाजपाच्या वाट्याला १५२ पेक्षा जास्त जागा सुटणार; फडणवीसांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 19:32 IST

नाही नाही नाही... भाजपा काँग्रेसला, एमआयएम, मुस्लिम लीगला सोबत घेणार नाही; फडणवीसांनी केले जाहीर

आज देशात सगळे पक्ष एकत्र येऊन मोदी नको अशी भावना मांडत आहेत. मोदींनी काय केले देशाला ११ वरून ५ व्या क्रमांकावर आणले. गरीबी कमी केली, हे आयएमएफ म्हणतोय. जगात सर्वात जास्त नोकऱ्या य़ा भारतात तयार होताय़त. मोदींच्या नेतृत्वाने करून दाखविले आहे. आज सगळे लोक मोदींविरोधात येतायत तेव्हा असे म्हणून चालणार नाही, की आम्ही कोणाला सोबत घेणार नाही. जे येतील त्यांना सोबत घेणार आहोत. आमचे दरवाजे खुले आहेत. एक गोष्ट सांगतो, काँग्रेसचा विचार चालणार नाही. तुष्टीकरणाचे विचार आहेत. आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही. एमआयएम, मुस्लिम लीगला सोबत घेऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भिवंडीतील पदाधिकारी मेळाव्यात फडणवीस बोलत होते. ही जी तुष्टीकरणाची निती आहे, ज्यामुळे भारताचे विभाजन झाले. का भारत आणि पाकिस्तान दोन देश झाले. त्यावेळच्या काही नेत्यांनी तुष्टीकरणाची निती ठेवली, यामुळे दोन देशांचा सिद्धांत मांडला गेला आणि देशाचे विभाजन झाले. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. आम्ही २२ पक्षांचे सरकार चालविले आहे. बावनकुळे काळजी करू नका, दुसऱ्यांचे स्वागत करताना तुमचे जे मनसुबे आहेत, तुमची जी तयारी आहे ती आम्ही कुठेही वाया घालवू देणार नाही, असे आश्वासनही फडणवीसांनी दिले.

महाभारत झाले तर रामायणही झालेच पाहिजे. काल परवा आमचे विद्वान मित्र नाना पटोले म्हणाले की अजित पवार बिभीषण आहेत, मला खूप आनंद झाला. पवार जर बिभीषण आहेत, आणि आमच्याकडे आलेत तर आपण कोण आणि ज्यांच्याकडून आलेत ते कोण? असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. बिभूषण देखील रामाकडे आले तेव्हा वानर देखील होते. ते म्हणाले कशाला घेता, आपल्याकडे एवढे वीर आहेत. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की, यांच्या आल्याने तिथली बातमी मिळेल हे खरे आहे, पण यांच्या येण्याने रावण मनातून पराभूत होईल. जो नेता मनातून पराभूत होतो तो विजयी होऊ शकत नाही. मी फक्त दाखले देतोय, मी कोणाला रावण, बिभीषण म्हणत नाहीय. मी संजय राऊत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला. 

सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आजच देऊ शकत नाही. जसे २०१९ मधील उत्तरे २३ मध्ये मिळाली, तशी ती २६ मध्ये मिळतील. शिवरायांनीच सांगितलेय की दगाबाजांना माफी नाही. १५२ आकडा हा बावनकुळेंमुळे आला की नाही मला माहिती नाही. शिवसेनेसोबतची युती १५१ मुळे तुटली होती. आदित्य ठाकरेंनी आकडा जाहीर केलेला आणि आम्ही एवढ्या खाली सीटा घेणार नाही असे म्हटले त्यामुळे झाले होते. फक्त एवढे सांगतो की तुम्हाला इतक्या सीट लढण्यासाठी नक्की देऊ की १५२ हा आकडा पूर्ण करता येईल. आपल्याला २८८ मतदारसंघात काम करायचे आहे, आपल्यालाही जिंकायचे आहे, आपल्या मित्रांनाही जिंकवायचे आहे. भाजपा बेईमान नाहीय, असे फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार