शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

भाजपाच्या वाट्याला १५२ पेक्षा जास्त जागा सुटणार; फडणवीसांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 19:32 IST

नाही नाही नाही... भाजपा काँग्रेसला, एमआयएम, मुस्लिम लीगला सोबत घेणार नाही; फडणवीसांनी केले जाहीर

आज देशात सगळे पक्ष एकत्र येऊन मोदी नको अशी भावना मांडत आहेत. मोदींनी काय केले देशाला ११ वरून ५ व्या क्रमांकावर आणले. गरीबी कमी केली, हे आयएमएफ म्हणतोय. जगात सर्वात जास्त नोकऱ्या य़ा भारतात तयार होताय़त. मोदींच्या नेतृत्वाने करून दाखविले आहे. आज सगळे लोक मोदींविरोधात येतायत तेव्हा असे म्हणून चालणार नाही, की आम्ही कोणाला सोबत घेणार नाही. जे येतील त्यांना सोबत घेणार आहोत. आमचे दरवाजे खुले आहेत. एक गोष्ट सांगतो, काँग्रेसचा विचार चालणार नाही. तुष्टीकरणाचे विचार आहेत. आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही. एमआयएम, मुस्लिम लीगला सोबत घेऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भिवंडीतील पदाधिकारी मेळाव्यात फडणवीस बोलत होते. ही जी तुष्टीकरणाची निती आहे, ज्यामुळे भारताचे विभाजन झाले. का भारत आणि पाकिस्तान दोन देश झाले. त्यावेळच्या काही नेत्यांनी तुष्टीकरणाची निती ठेवली, यामुळे दोन देशांचा सिद्धांत मांडला गेला आणि देशाचे विभाजन झाले. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. आम्ही २२ पक्षांचे सरकार चालविले आहे. बावनकुळे काळजी करू नका, दुसऱ्यांचे स्वागत करताना तुमचे जे मनसुबे आहेत, तुमची जी तयारी आहे ती आम्ही कुठेही वाया घालवू देणार नाही, असे आश्वासनही फडणवीसांनी दिले.

महाभारत झाले तर रामायणही झालेच पाहिजे. काल परवा आमचे विद्वान मित्र नाना पटोले म्हणाले की अजित पवार बिभीषण आहेत, मला खूप आनंद झाला. पवार जर बिभीषण आहेत, आणि आमच्याकडे आलेत तर आपण कोण आणि ज्यांच्याकडून आलेत ते कोण? असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. बिभूषण देखील रामाकडे आले तेव्हा वानर देखील होते. ते म्हणाले कशाला घेता, आपल्याकडे एवढे वीर आहेत. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की, यांच्या आल्याने तिथली बातमी मिळेल हे खरे आहे, पण यांच्या येण्याने रावण मनातून पराभूत होईल. जो नेता मनातून पराभूत होतो तो विजयी होऊ शकत नाही. मी फक्त दाखले देतोय, मी कोणाला रावण, बिभीषण म्हणत नाहीय. मी संजय राऊत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला. 

सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आजच देऊ शकत नाही. जसे २०१९ मधील उत्तरे २३ मध्ये मिळाली, तशी ती २६ मध्ये मिळतील. शिवरायांनीच सांगितलेय की दगाबाजांना माफी नाही. १५२ आकडा हा बावनकुळेंमुळे आला की नाही मला माहिती नाही. शिवसेनेसोबतची युती १५१ मुळे तुटली होती. आदित्य ठाकरेंनी आकडा जाहीर केलेला आणि आम्ही एवढ्या खाली सीटा घेणार नाही असे म्हटले त्यामुळे झाले होते. फक्त एवढे सांगतो की तुम्हाला इतक्या सीट लढण्यासाठी नक्की देऊ की १५२ हा आकडा पूर्ण करता येईल. आपल्याला २८८ मतदारसंघात काम करायचे आहे, आपल्यालाही जिंकायचे आहे, आपल्या मित्रांनाही जिंकवायचे आहे. भाजपा बेईमान नाहीय, असे फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार