शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Sujay Vikhe Patil: "सर्वात आधी PM मोदींचा फोटो वापरून गद्दारी कोणी केली?"; सुजय विखेंचा Uddhav Thackeray यांना रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 17:57 IST

"शरद पवार शिवसेनेला संपवतील म्हणणारा मी पहिला खासदार"

Sujay Vikhe Patil slams Uddhav Thackeray: महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत धुसफुसीमुळे अखेर जून महिन्याच्या अखेरीस शिवसेनेत दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांना साथीला घेऊन बंडखोरी केली आणि भाजपासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापना केली. या सत्तास्थापनेच्या वेळी आणि त्यानंतरही शिंदे गट सातत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना आणि त्यांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरूच्चार करताना दिसतो. मात्र, 'गद्दारांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो किंवा नाव वापरून मतं मागू नये', असा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत बोलून दाखवला. त्यानंतर, भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी उद्धव यांना जळजळीत सवाल केला आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गद्दार म्हणणे किंवा न म्हणणे यावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह आहेत. "शिवसेनेतील शिंदे गटावर गद्दारीचा आरोप केला जातो, पण पहिली गद्दारी कुणी केली? भाजपा सेनेची युती होती, तेव्हा पंतप्रधान नरेंद मोदींचा फोटो वापरुन कोण निवडून आले? आणि मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपला सोडून काँग्रेस-राष्टवादीशी कोणी युती केली? मग पहिले गद्दार नक्की कोण?" असे रोखठोक सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. ते अहमदनगरच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

"राष्ट्रवादीचे शरद पवार हे शिवसेनेला संपवतील हे म्हणणारा मी पहिला खासदार होतो. ४० आमदारांना शिवसेना सोडून का जावे लागले? त्यात ८ कॅबिनेट मंत्री होते. मुख्यमंत्री सेनेचा असतानाही सेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे निधीसाठी जावे लागl होते. आता शेतकरी, जनतेच्या हितासाठी शिंदे-फडणवीस सरकार बनले आहे. भाजपा हा त्याग करणारा पक्ष आहे. पक्षाचे १०६ आमदार असतानाही ४० आमदार असलेल्‍या गटाचा मुख्‍यमंत्री भाजपाने करुन दाखविला. पंतप्रधानपदी जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत देश सुखी राहील", यावरही सुजय विखे यांनी जोर दिला.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे