शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Sudhir Mungantiwar : "फक्त चेहऱ्याचं सरकार म्हणजे कुटुंबाचं सरकार, बाप-बेटेकी सरकार"; सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 15:14 IST

BJP Sudhir Mungantiwar : "जनादेशाचा अवमान करून, जनतेच्या पाठीत खंजीर खूपसून सत्ता प्राप्त केली, ती सत्ता जेव्हा जाते तेव्हा वेदना होतात, दु:ख होतं."

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, यामध्ये अनेक इच्छुकांना संधी मिळाली नसल्याची चर्चा होती. तसेच शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडूही नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आजघडीला अनेक सुप्त ज्वालामुखी आहेत. हे ज्वालामुखी कधी फुटतील, हे सांगता येत नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊन अद्याप खातेवाटप होऊ शकलेले नाही. ही नामुष्कीच आहे. मुळात हे सरकार अशा अनेक सुप्त ज्वालामुखींच्या तोंडावर बसले आहे, असे म्हटले आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी "फक्त चेहऱ्याचं सरकार म्हणजे कुटुंबाचं सरकार, बाप-बेटेकी सरकार" असं म्हणत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तसेच "बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी खुद्दारी करणारी शिवसेना ही आमच्यासोबत" असं देखील म्हटलं आहे. "बिना चेहऱ्याचं सरकार म्हणजे जनतेचं सरकार आणि फक्त चेहऱ्याचं सरकार म्हणजे कुटुंबाचं सरकार, बाप-बेटेकी सरकार. सामनामधून टीका करण्याचं कारण काय? जेव्हा सत्ता जाते तेव्हा वेदना होतात" असं म्हटलं आहे. 

"जनादेशाचा अवमान करून, जनतेच्या पाठीत खंजीर खूपसून सत्ता प्राप्त केली, ती सत्ता जेव्हा जाते तेव्हा वेदना होतात, दु:ख होतं. त्यांचं आयुष्य हे फक्त माझा परिवार आणि माझा पक्ष, प्रथम मी आहे. सत्ता जाण्याचं जे दु:ख आहे ते कुठेतरी हलकं व्हावं म्हणून हे अशाप्रकारची टीका करतात" अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवारांनी जोरदार निशाणा साधला आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन तोंडावर आला आहे; पण राज्याच्या मंत्रिमंडळाचे ना खातेवाटप झाले आहे ना जिल्हय़ा-जिल्हय़ांचे पालकमंत्री ठरले आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्ताराला ४० दिवस लागले; आता त्यातील खातेवाटपासाठीही घोळात घोळ सुरू आहे. ४० दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा पाळणा हलला तेव्हा या पाळण्याची दोरी नेमकी कोणाकडे आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. मात्र या पाळण्याला अनेक दोऱ्या आहेत आणि त्या आतल्या-बाहेरच्या अशा अनेकांच्या हातात आहेत असे दिसत आहे. जे पाळण्यात आहेत ते त्यांना हव्या असलेल्या खात्यांसाठी, तर ज्यांना पाळण्यात जागा मिळालेली नाही ते नाराजी व्यक्त करण्यासाठी हातातील दोरीचा ‘झटका’ देत आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना