शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

"पवारांमुळे, 'भूखंडाचे श्रीखंड' शब्द महाराष्ट्राला मिळाला"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 1:06 PM

जालना जिल्ह्यात 51 हेक्टर शासकीय जमीन वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला देण्यात आली आहे. या जमिनीची अंदाजे 10 कोटी रुपये किमंत असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : जालना जिल्ह्यात 51 हेक्टर जमीन राज्य सरकारने वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला दिली असल्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. शरद पवार हे या संस्थेशी संबंधित असून त्यामुळेच सर्व नियम डावलून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर 'भूखंडाचे श्रीखंड' हा शब्दप्रयोग शरद पवारांमुळेच महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला मिळाला असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे.

जालना जिल्ह्यात 51 हेक्टर शासकीय जमीन वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला देण्यात आली आहे. या जमिनीची अंदाजे 10 कोटी रुपये किमंत असल्याचे बोलले जात आहे. तर विशेष बाब म्हणून अल्पदरात ही जमीन संबधित संस्थेला देण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी सुद्धा दिली आहे. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे सरकारवर टीका सुद्धा केली आहे. तर याचवेळी शरद पवार यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे.

एक मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना माधव भंडारी म्हणाले की, वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला अगदी कमी दरात जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महराष्ट्रात पवारांचे राज्य पुन्हा सुरु झाले असल्याचा हा थेट पुरावा आहे. ज्या-ज्या वेळी शरद पवार सत्तेत आले, त्यांनी त्या-त्या वेळी आपल्या संस्थाना,आपल्या जवळच्या आणि आसपासच्या लोकांना शासकीय जमिनींची खिरापत वाटली. आता पुन्हा तेच उद्योग सुरु झाले असल्याचा आरोप भंडारी यांनी केला आहे.