शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

'बिनकामाची पन्नाशी'; भाजपकडून ठाकरे सरकारवर 'सोशल अटॅक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 17:10 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने महाविकास आघाडीच्या सरकारवर 'बिनकामाची पन्नाशी' अशा शब्दांत घणाघाती टीका केली आहे.

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आज 50 दिवस झाले आहेत. तर याच मुद्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने सोशल मिडियावरून ठाकरे सरकार आणि फडणवीस सरकारने केलेल्या सुरवातीच्या 50 दिवसांच्या कामांचा आलेख दाखवत, 50 दिवस महा‘भकास’आघाडीचे अशा शब्दात टीका केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने महाविकास आघाडीच्या सरकारवर 'बिनकामाची पन्नाशी' अशा शब्दांत घणाघाती टीका केली आहे. यावेळी माजी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सरकार स्थापन झाल्यावर सुरवातीच्या 50 दिवसात घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामांचा उल्लेख केला गेला आहे.

तर दुसऱ्या बाजूला मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 50 दिवसात शासकीय योजनांना दिलेल्या स्थगितीचा उल्लेख करण्यात आला आहे. तर आत्ताच सरकार म्हणजे फक्त स्थगिती सरकार असल्याची टीका करण्यात आली आहे.

ठाकरे सरकारच्या नेत्यांचे 50 दिवस हे फक्त मंत्रिमंडळ विस्तार, खाते,बंगले,दालन यासाठी घेतलेल्या बैठकीतच गेल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर नगरविकास खात्याचे कामे, ग्रामविकास खात्याचे कामे, जलयुक्त शिवार आणि इतर कामांना स्थगिती देऊन, हे सरकार गेल्या 50 दिवसात फक्त स्थगिती सरकार ठरला असल्याचा सुद्धा आरोप भाजपने केला आहे.