शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

“फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 15:08 IST

corona virus: घोळ आणि झोल हे बहुदा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातच ठरले असावे, अशी टीका करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?हाच मविआ सरकारचा किमान समान कार्यक्रमनालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे?

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची (corona virus) वाढती संख्या, कोरोना लसींचा तुटवडा, प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी यांवरून आता ठाकरे सरकारवर विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्षांनीही टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे राज्यात लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे सांगितले जात असून, याबाबत कधीही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच नालासोपारा येथील विनायका रुग्णालयात ७ जणांचा ऑक्सिनजनअभावी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता, फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?, असा प्रश्न भाजपकडून करण्यात आला आहे. (bjp slams thackeray govt over corona situation in the state)

भाजपकडून एकामागोमाग एक ट्विट करण्यात आले आहेत. यामध्ये ठाकरे सरकार आणि आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा यांवर हल्लाबोल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का?, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे. 

कोरोना व्यवस्थापनात मोठ्या त्रुटी; केंद्रीय पथकाचा महाराष्ट्रावर ठपका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?

फेसबुक लाईव्हवर मोठंमोठ्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे आता या प्रकरणावर काही बोलतील का? राज्यातील ठाकरे सरकार आणि वसुली या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ठाकरे सरकारच्या या भ्रष्ट कारभाराची शिक्षा आज राज्यातील जनतेला भोगावी लागत आहे. कुठे रेमडेसीवीरचा काळाबाजार तर कुठे आरोग्य अधिकारीच व्हेंटिलेटरसाठी लाच घेत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मते सर्व आलबेल आहे!, असा हल्लाबोल भाजपने केला आहे. 

राज्याला किती लस मिळाल्या? भाजपने थेट आकडेवारीच दिली; पाहा, डिटेल्स

हाच मविआ सरकारचा किमान समान कार्यक्रम

घोळ आणि झोल हे बहुदा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातच ठरलं असावं. कोरोनाचं संकट थैमान घालत असताना आरोग्य व्यवस्थेच्या नावाखाली लुटालुटीचे नवीन धंदे सुरू आहेत. आता या सर्व गोष्टीला राजाचा आशीर्वाद आहे की त्याच्या मंत्र्यांचा हे त्यालाच ठाऊक!, अशी बोचरी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. 

“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

दरम्यान, राज्यात लॉकडाऊन जाहीर केला गेला तरी सरकार सर्व परप्रांतीय कामगारांची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारRajesh Topeराजेश टोपेPoliticsराजकारण