शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

भाजप-शिवसेनेला दुष्काळाचे गांभीर्य नाही : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 13:13 IST

प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना दिली भेट

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दुष्काळाची भीषण स्थिती स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने चारा छावण्या उभारल्या प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेट

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दुष्काळाची भीषण स्थिती आहे. मंगळवेढ्यातही अशीच परिस्थिती आहे. स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने चारा छावण्या उभारल्या आहेत. स्थानिक पातळीवर निधी जमा करुन चारा खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.  त्यांना अद्याप अनुदान आलेले नाही. शासनाने चाºयाचा दरही ठरविलेला नाही. उसाचा चारा उपलब्ध आहे. परंतु, तो सुकलेला असल्याने गुरांच्या जिभेला चिरा पडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या नादात भाजप आणि शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागाकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते़ पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की,  चारा छावण्यांमध्ये जनावरांसोबत प्रत्येक घरातील एक माणूसही मुक्कामाला आहे. रोजगार हमी योजनेखाली या माणसाची नोंद करुन त्याला मदत मिळायला हवी. चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे ही चूक आहे. हैदराबादला चारा चांगला चारा मिळतो. राज्य सरकारने दुष्काळासाठी विशेष निधीची तरतूद करावी. जिल्हाधिकाºयांना ठराविक दुष्काळ निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी. दुष्काळासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आम्ही ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असेही आंबेडकर यांनी सांगितले. 

धरणे, तलावांतील गाळ काढा- दुष्काळाच्या परिस्थितीत धरणे आणि तलावांतील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. या परिस्थितीत त्यातील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्यायला हवी. त्यासाठी जेसीबी आणि पोकलेन यांचे अधिग्रहण करुन ठेवण्यात यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करणार आहोत, असेही आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळ