शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाजप-शिवसेनेला दुष्काळाचे गांभीर्य नाही : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 13:13 IST

प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना दिली भेट

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दुष्काळाची भीषण स्थिती स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने चारा छावण्या उभारल्या प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेट

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दुष्काळाची भीषण स्थिती आहे. मंगळवेढ्यातही अशीच परिस्थिती आहे. स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने चारा छावण्या उभारल्या आहेत. स्थानिक पातळीवर निधी जमा करुन चारा खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.  त्यांना अद्याप अनुदान आलेले नाही. शासनाने चाºयाचा दरही ठरविलेला नाही. उसाचा चारा उपलब्ध आहे. परंतु, तो सुकलेला असल्याने गुरांच्या जिभेला चिरा पडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या नादात भाजप आणि शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागाकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते़ पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की,  चारा छावण्यांमध्ये जनावरांसोबत प्रत्येक घरातील एक माणूसही मुक्कामाला आहे. रोजगार हमी योजनेखाली या माणसाची नोंद करुन त्याला मदत मिळायला हवी. चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे ही चूक आहे. हैदराबादला चारा चांगला चारा मिळतो. राज्य सरकारने दुष्काळासाठी विशेष निधीची तरतूद करावी. जिल्हाधिकाºयांना ठराविक दुष्काळ निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी. दुष्काळासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आम्ही ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असेही आंबेडकर यांनी सांगितले. 

धरणे, तलावांतील गाळ काढा- दुष्काळाच्या परिस्थितीत धरणे आणि तलावांतील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. या परिस्थितीत त्यातील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्यायला हवी. त्यासाठी जेसीबी आणि पोकलेन यांचे अधिग्रहण करुन ठेवण्यात यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करणार आहोत, असेही आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळ