शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

आमदारांची ‘पळवापळवी’! भाजप म्हणतो, २५ आमदार संपर्कात; सेना म्हणते ५० आमदार संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 09:59 IST

एकमेकांच्या आमदारांवरून भाजप, शिवसेनेचे दावे-प्रतिदावे

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येईल, असे म्हटले जात असतानाच भाजप आणि शिवसेनेने एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचे दावे-प्रतिदावे केले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला, तर या उलट भाजपचेच ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा प्रतिदावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला. महाविकास आघाडीचे बरेच आमदार सरकारवर तीव्र नाराज आहेत आणि २५ आमदारांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचे २५ आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार घालणार होते; पण त्यांची समजूत काढली गेली, असा दावा मंत्री दानवे यांनी जालन्यात केला. दानवे यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, दानवे यांनी हा दावा कोणत्या नशेत केला, हे मला माहिती नाही. कदाचित आघाडीचे १७५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांना म्हणायचे असेल. संपर्कात आहेत तर घ्या ना, थांबलाय कशासाठी? असा सवालही त्यांनी केला. भाजपचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले.

आमदार फुटल्यास विधानसभेत दिसणार नाही - जयंत पाटीलआमचे आमदार फुटणार नाहीत. जर कुणी फुटला तर तो पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. लोकच त्यांना सळो की पळो करून सोडतील. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्या आमदाराविरोधात लढू आणि त्याचा पराभव करू,  अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना इशारा दिला आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून भाजपच्या आमदारांनाही मोठा निधी दिला आहे. फडणवीसांच्या काळातही एवढा निधी मिळाला नसल्याचे भाजपचे आमदार आम्हाला सांगतात. भाजपचे आमदार आमच्या सरकारवर खुश आहेत, असा दावाही त्यांनी केला.

कराड पुड्या सोडतात- अब्दुल सत्तार केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनीही महाविकास आघाडीतील आमदार नाराज असल्याचे वक्तव्य करीत या नाराज आमदारांनी भाजपमध्ये यावे, अशी ऑफर दिली. त्यावर राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी निशाणा साधला. कराड हे पुड्या सोडण्याचे काम करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. नाराज वगैरे कोणीही नाही, असे सत्तार म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाShiv Senaशिवसेना