शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्षांच्या 'डबल डिजीट' मागणीमुळे युतीची डोकेदुखी वाढली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 15:17 IST

भाजप १६० जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील ११० पेक्षा कमी जागांच्या खाली येण्यास तयार नाही. यामुळे राहतात केवळ १८ जागा. या १८ जागांमध्ये घटक पक्षाचे गणित बसविण्याचे आव्हान भाजप-शिवसेनेसमोर आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली आहे. परंतु, युतीमध्ये अनेक मित्रपक्ष असून या मित्र पक्षांच्या जागांच्या मागणीवरून युतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगला असताना मित्रपक्ष आपली मागणी पुढं रेटत आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी विधानसभेला १० जागांची मागणी पुढे केली आहे. तसेच सर्व १० जागा आपण कमळाच्या नव्हे तर स्वतंत्र चिन्हावर लढविणार असंही त्यांनी म्हटले आहे. आरपीआयने ही मागणी भाजपकडे केली आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जाणकर यांनी तर भाजपकडे ५५ जागांची मागणी केली आहे. त्यांना पक्षाची मान्यता मिळविण्याकरिता किमान १२ जागा आवश्यक आहे. तसेच राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार विनायक मेटे यांनी देखील दोन आकडी जागा मागितल्या आहेत.

दरम्यान भाजप आणि शिवसेना युती घटकपक्षांना एकूण १८ जागा सोडण्याच्या तयारीत आहेत. यापैकी १० जागा एकट्या आरपीआयने घेतल्यास, केवळ आठ जागा इतर पक्षांना उरणार आहेत. त्यातच भाजपसोबत जनसुराज्य शक्ती पक्षही आला आहे. त्यामुळे या पक्षालाही युतीमध्ये जागा द्याव्या लागणार आहे. त्यातच उभय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्यां नेत्याचं नियोजनही शिवसेना आणि भाजपला करावे लागणार आहे. एकंदरीत मित्रपक्षांच्या डबड डिजीट मागणीमुळे युतीसमोर पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मित्रपक्षांना किती न्याय मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपला अंतर्गत सर्वेत १६० जागांचा

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवल्यास पक्षाला १६० जागा दाखविण्यात आल्या आहेत. या जागा बहुमतापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे भाजप १६० जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील ११० पेक्षा कमी जागांच्या खाली येण्यास तयार नाही. यामुळे राहतात केवळ १८ जागा. या १८ जागांमध्ये घटक पक्षाचे गणित बसविण्याचे आव्हान भाजप-शिवसेनेसमोर आहे.