शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मित्रपक्षांच्या 'डबल डिजीट' मागणीमुळे युतीची डोकेदुखी वाढली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 15:17 IST

भाजप १६० जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील ११० पेक्षा कमी जागांच्या खाली येण्यास तयार नाही. यामुळे राहतात केवळ १८ जागा. या १८ जागांमध्ये घटक पक्षाचे गणित बसविण्याचे आव्हान भाजप-शिवसेनेसमोर आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली आहे. परंतु, युतीमध्ये अनेक मित्रपक्ष असून या मित्र पक्षांच्या जागांच्या मागणीवरून युतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगला असताना मित्रपक्ष आपली मागणी पुढं रेटत आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी विधानसभेला १० जागांची मागणी पुढे केली आहे. तसेच सर्व १० जागा आपण कमळाच्या नव्हे तर स्वतंत्र चिन्हावर लढविणार असंही त्यांनी म्हटले आहे. आरपीआयने ही मागणी भाजपकडे केली आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जाणकर यांनी तर भाजपकडे ५५ जागांची मागणी केली आहे. त्यांना पक्षाची मान्यता मिळविण्याकरिता किमान १२ जागा आवश्यक आहे. तसेच राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार विनायक मेटे यांनी देखील दोन आकडी जागा मागितल्या आहेत.

दरम्यान भाजप आणि शिवसेना युती घटकपक्षांना एकूण १८ जागा सोडण्याच्या तयारीत आहेत. यापैकी १० जागा एकट्या आरपीआयने घेतल्यास, केवळ आठ जागा इतर पक्षांना उरणार आहेत. त्यातच भाजपसोबत जनसुराज्य शक्ती पक्षही आला आहे. त्यामुळे या पक्षालाही युतीमध्ये जागा द्याव्या लागणार आहे. त्यातच उभय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्यां नेत्याचं नियोजनही शिवसेना आणि भाजपला करावे लागणार आहे. एकंदरीत मित्रपक्षांच्या डबड डिजीट मागणीमुळे युतीसमोर पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मित्रपक्षांना किती न्याय मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपला अंतर्गत सर्वेत १६० जागांचा

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवल्यास पक्षाला १६० जागा दाखविण्यात आल्या आहेत. या जागा बहुमतापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे भाजप १६० जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील ११० पेक्षा कमी जागांच्या खाली येण्यास तयार नाही. यामुळे राहतात केवळ १८ जागा. या १८ जागांमध्ये घटक पक्षाचे गणित बसविण्याचे आव्हान भाजप-शिवसेनेसमोर आहे.