शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

भाजप-सेना भांडत राहिल्यास २०१९ मध्ये सत्ता गमावणार - रामदास आठवले

By admin | Updated: June 20, 2016 18:46 IST

सध्या शिवसेना व भाजपाकडून आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे निजाम किंवा रझाकारांचे नाही तर महायुतीचे सरकार आहे. हे दोन्ही पक्ष असेच भांडत राहिल्यास

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 20 -  सध्या शिवसेना व भाजपाकडून आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे निजाम किंवा रझाकारांचे नाही तर महायुतीचे सरकार आहे. हे दोन्ही पक्ष असेच भांडत राहिल्यास आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता गमवावी लागेल असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी पत्रपरिषदेत दिला.पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संकल्प शिबिर व उमवित आयोजित कार्यक्रमासाठी ते सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.वादापेक्षा विकासावर भर द्या...खासदार आठवले म्हणाले, शिवसेना व भाजपा हे एकमेकांचा निजाम आणि रझाकार असा उल्लेख करीत आहे. शिवसेना व भाजपा हे आमचे मित्रपक्ष आहेत. त्यांनी वाद थांबवून विकासावर भर देणे गरजेचे आहे. राज्यात सिंचनाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात रखडले आहेत. काही दिवसांपूर्वी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंबई व कोकण परिसरात पडणारा पाऊस अडवून त्याचा कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात सिंचनासाठी उपयोग करण्याबाबत पत्र दिले आहे. दुष्काळी स्थिती गंभीर आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी पोहचविण्याची वेळ आली आहे. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची गरज नव्हती...माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर अंजली दमानिया यांच्यासह काही जणांनी आरोप केले. मात्र झालेल्या आरोपांची शहानिशा होणे गरजेचे होते. त्यामुळे खडसे यांच्या राजीनाम्याची गरज नव्हती. मुख्यमंत्रीपदासाठी ते इच्छुक होते. नंतरच्या काळात त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. पक्षाने त्यांना महत्त्वाची खातीदेखील दिली. त्यामुळे तसा काही वाद नव्हता. मात्र त्यांनी आता राजीनामा दिलाच आहे तर चौकशी तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे. विरोधकांनी काम करू द्यावे...लोकशाहीत विरोधकांनादेखील सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने महत्त्व आहे. त्यामुळे त्यांनी मंत्र्यांना काम करू द्यावे. विरोधकांनी केवळ आरोप करण्यात वेळ खर्च करू नये असा सल्लाही आठवले यांनी दिला. लोकसभेत जी.एस.टी.विधेयक हे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. पंतप्रधानांनी या विधेयकात दुरुस्ती करण्याबाबत आश्वासन देखील दिले. मात्र तरीही विरोधक कामात अडथळा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकार हे योग्य दिशेने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.