शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-सेना भांडत राहिल्यास २०१९ मध्ये सत्ता गमावणार - रामदास आठवले

By admin | Updated: June 20, 2016 18:46 IST

सध्या शिवसेना व भाजपाकडून आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे निजाम किंवा रझाकारांचे नाही तर महायुतीचे सरकार आहे. हे दोन्ही पक्ष असेच भांडत राहिल्यास

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 20 -  सध्या शिवसेना व भाजपाकडून आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे निजाम किंवा रझाकारांचे नाही तर महायुतीचे सरकार आहे. हे दोन्ही पक्ष असेच भांडत राहिल्यास आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता गमवावी लागेल असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी पत्रपरिषदेत दिला.पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संकल्प शिबिर व उमवित आयोजित कार्यक्रमासाठी ते सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.वादापेक्षा विकासावर भर द्या...खासदार आठवले म्हणाले, शिवसेना व भाजपा हे एकमेकांचा निजाम आणि रझाकार असा उल्लेख करीत आहे. शिवसेना व भाजपा हे आमचे मित्रपक्ष आहेत. त्यांनी वाद थांबवून विकासावर भर देणे गरजेचे आहे. राज्यात सिंचनाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात रखडले आहेत. काही दिवसांपूर्वी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंबई व कोकण परिसरात पडणारा पाऊस अडवून त्याचा कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात सिंचनासाठी उपयोग करण्याबाबत पत्र दिले आहे. दुष्काळी स्थिती गंभीर आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी पोहचविण्याची वेळ आली आहे. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची गरज नव्हती...माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर अंजली दमानिया यांच्यासह काही जणांनी आरोप केले. मात्र झालेल्या आरोपांची शहानिशा होणे गरजेचे होते. त्यामुळे खडसे यांच्या राजीनाम्याची गरज नव्हती. मुख्यमंत्रीपदासाठी ते इच्छुक होते. नंतरच्या काळात त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. पक्षाने त्यांना महत्त्वाची खातीदेखील दिली. त्यामुळे तसा काही वाद नव्हता. मात्र त्यांनी आता राजीनामा दिलाच आहे तर चौकशी तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे. विरोधकांनी काम करू द्यावे...लोकशाहीत विरोधकांनादेखील सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने महत्त्व आहे. त्यामुळे त्यांनी मंत्र्यांना काम करू द्यावे. विरोधकांनी केवळ आरोप करण्यात वेळ खर्च करू नये असा सल्लाही आठवले यांनी दिला. लोकसभेत जी.एस.टी.विधेयक हे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. पंतप्रधानांनी या विधेयकात दुरुस्ती करण्याबाबत आश्वासन देखील दिले. मात्र तरीही विरोधक कामात अडथळा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकार हे योग्य दिशेने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.