शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

भाजप-सेना भांडत राहिल्यास २०१९ मध्ये सत्ता गमावणार - रामदास आठवले

By admin | Updated: June 20, 2016 18:46 IST

सध्या शिवसेना व भाजपाकडून आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे निजाम किंवा रझाकारांचे नाही तर महायुतीचे सरकार आहे. हे दोन्ही पक्ष असेच भांडत राहिल्यास

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 20 -  सध्या शिवसेना व भाजपाकडून आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे निजाम किंवा रझाकारांचे नाही तर महायुतीचे सरकार आहे. हे दोन्ही पक्ष असेच भांडत राहिल्यास आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता गमवावी लागेल असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी पत्रपरिषदेत दिला.पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संकल्प शिबिर व उमवित आयोजित कार्यक्रमासाठी ते सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.वादापेक्षा विकासावर भर द्या...खासदार आठवले म्हणाले, शिवसेना व भाजपा हे एकमेकांचा निजाम आणि रझाकार असा उल्लेख करीत आहे. शिवसेना व भाजपा हे आमचे मित्रपक्ष आहेत. त्यांनी वाद थांबवून विकासावर भर देणे गरजेचे आहे. राज्यात सिंचनाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात रखडले आहेत. काही दिवसांपूर्वी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंबई व कोकण परिसरात पडणारा पाऊस अडवून त्याचा कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात सिंचनासाठी उपयोग करण्याबाबत पत्र दिले आहे. दुष्काळी स्थिती गंभीर आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी पोहचविण्याची वेळ आली आहे. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची गरज नव्हती...माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर अंजली दमानिया यांच्यासह काही जणांनी आरोप केले. मात्र झालेल्या आरोपांची शहानिशा होणे गरजेचे होते. त्यामुळे खडसे यांच्या राजीनाम्याची गरज नव्हती. मुख्यमंत्रीपदासाठी ते इच्छुक होते. नंतरच्या काळात त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. पक्षाने त्यांना महत्त्वाची खातीदेखील दिली. त्यामुळे तसा काही वाद नव्हता. मात्र त्यांनी आता राजीनामा दिलाच आहे तर चौकशी तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे. विरोधकांनी काम करू द्यावे...लोकशाहीत विरोधकांनादेखील सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने महत्त्व आहे. त्यामुळे त्यांनी मंत्र्यांना काम करू द्यावे. विरोधकांनी केवळ आरोप करण्यात वेळ खर्च करू नये असा सल्लाही आठवले यांनी दिला. लोकसभेत जी.एस.टी.विधेयक हे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. पंतप्रधानांनी या विधेयकात दुरुस्ती करण्याबाबत आश्वासन देखील दिले. मात्र तरीही विरोधक कामात अडथळा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकार हे योग्य दिशेने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.