शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शहिदांच्या बलिदानाचे भाजपा भांडवल करतेय; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 05:49 IST

सरकार शहिदांच्या नावाने राजकारण करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

कळंबोली : देशासाठी शहीद झालेल्या सैन्यातील जवानांचे भारतीय जनता पार्टी भांडवल करीत आहे. हे माझे नाही, तर सैनिकांच्या वीरपत्नींची म्हणणे आहे. आम्हाला काही नको, पण राजकारण करू नका, असे त्या भगिनी सांगतात. तरीही सरकार शहिदांच्या नावाने राजकारण करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.कळंबोलीत न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात सोमवारी माढा लोकसभा मतदारसंघाचा मेळावा पार पडला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार बाळाराम पाटील, माजी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे, आमदार बाळाराम पाटील, गुलाबराव जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.भाजपाने धनगर, मराठा समाजाला फसविले आहे. त्यांच्या पदरात निराशेशिवाय दुसरे काहीच पडले नसल्याचे पवार म्हणाले. माथाडी कामगारांची चळवळ हे सरकार संपवायला पाहत आहे. त्यामुळे भाजपाच्या कामगार, शेतकरी धोरणाविरोधात सर्वांनी उभे राहिले पाहिजे. या देशात अनेकांनी राज्य केले. त्यामध्ये मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही यांच्यासह कित्येकांचा समावेश होता. मात्र छत्रपती असे एकमेव राजे होते की त्यांनी कधीच भोसलेंचे राज्य असे म्हटले नाही; तर रयतेचे हे राज्य आहे, असा उल्लेख केला.नोटाबंदीने सर्वसामान्यांचे हाल केले. मात्र एक काळा पैसाही आणला नसल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या काळात राफेल विमानाचा निर्णय घेतला तेव्हा ते ३५० कोटींचे होते. आज ते विमान भाजपा सरकारने १६६० कोटींवर नेले आहे. ‘न खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्यांनीच त्यावर डल्ला मारल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.प्रत्येक शहराचा कणा म्हणजे माथाडी कामगार आहे. त्याने काम बंद केले तर सर्वच ठप्प होईल. नुकसान किती याची गणतीच करता येणार नाही. माथाडी कायदा बदलण्याचे सोडा; साधा विचार झाला तरी बलिदान करण्याकरिता मी पुढे असेल, असे उदयनराजे भोसले या वेळी म्हणाले. शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली म्हणजे आमचा विजय झाला, असे कोणी म्हणत असेल तर माढा सोडा कोणत्याही मतदारसंघात ते उभे राहिले तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असेही उदयनराजे म्हणाले. या वेळी शशिकांत शिंदे, बाळाराम पाटील, गुलाबराव जगताप आणि दीपक साळुंखे, प्रभाकर देशमुख यांचीही भाषणे झाले.संवाद मेळावा ‘माढा’चा की ‘म्हाडा’चा?कळंबोली येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात सोमवारी सायंकाळी माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र आयोजकांनी स्टेजवरील बॅनरवर ‘माढा’ऐवजी ‘म्हाडा’ असा उल्लेख केला होता. गेल्या काही दिवसांपासून हा मतदारसंघ गाजत असताना म्हाडा असा उल्लेख केल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू होती.माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला, करमाळा, माळशिरस, माढा, माण, फलटण येथील अनेक नागरिक पनवेल, नवी मुंबई, मुंबईत नोकरी- व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. माढा मतदारसंघातून राष्टÑवादीचे प्रमुख शरद पवार उभे राहणार होते. परंतु त्यांनी सोमवारी माढामधून निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. त्यामुळे माढा मतदारसंघातून आता कुणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.मागील आठवड्यात मुंबईतील मतदार, कार्यकर्ते आणि माथाडी कामगारांचा संवाद मेळावा घेण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप यांनी कळंबोलीत सोमवारी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. येथे शिंदे आणि जगताप यांनी भाषणबाजी करीत शरद पवार यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टेजवरील बॅनरवर ‘माढा’ऐवजी ‘म्हाडा’ असा जो उल्लेख करण्यात आला होता, ते त्यांच्या लक्षातही आले नाही. या मेळाव्यासाठी गुलाबराव जगताप दोन दिवसांपासून या ठिकाणी ठाण मांडून होते. मात्र, तरीही मतदारसंघाचे नाव चुकल्याने उपस्थितांत चर्चा सुरू होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMartyrशहीद