शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

BJP vs Shivsena: संपवून दाखवलं! ; भाजपा आमदाराने फेसबुक पोस्टमधून शिवसेनेला डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 14:40 IST

राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजपाचे नेतेमंडळी ठाकरे गटावर चांगलेच तुटून पडले आहेत.

BJP vs Shivsena: शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखाली ४० आमदारांनी भाजपासोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत बंड झाल्यापासून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावला आणि अतिशय बोचऱ्या शब्दांत बंडखोर आमदारांवर टीका केली. संजय राऊत यांनी टीका करताना भाषेतील सभ्यपणा टिकवून ठेवायला हवा, अशी भावना नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर व्यक्त केली. मात्र काही कारणास्तव शिवसेनेतून आमदारांनंतर आता माजी नगरसेवकदेखील शिंदे गटात सामील होत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेच उरतील असा टोला भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला होता. त्यानंतर आता भाजपाचे आमदारा राम कदम यांनी नाव न घेता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून शिवसेनेला ट्रोल केले.

महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या धोरणांवर सातत्याने टीका करणारे भाजपा आमदारा राम कदम यांनी उद्धव ठाकरेशिवसेना यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मुंबईतील मनपा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला. राम कदम यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. यामध्ये 'संपवून दाखवलं!' इतकाच मजकूर लिहिण्यात आला होता. राम कदम यांच्या या वक्तव्याचा रोख शिवसेनेच्या दिशेने असल्याचे दिसले. शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात 'करुन दाखवलं' ही टॅगलाईन वापरली होती. त्याचाच धागा पकडत राम कदम यांनी 'संपवून दाखवलं' असा मजकूर लिहून शिवसेनेला डिवचलं.

दरम्यान, भाजपाचे रावसाहेब दानवे यांनीही शिवसेनेवर काल तोंडसुख घेतलं. "महाराष्ट्रात सरकार आल्याचा आनंद झाला. पुढील नगरपालिका, पंचायत समित्या, महापालिका निवडणुका आम्हीच जिंकू. गेल्या वेळी ९२ पैकी ८२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी तर युतीही नव्हती, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आमच्या सोबत आहेत. शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. शिवसेनेचे १२ खासदार आमच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात सर्व निवडणुका आम्ही जिंकू" असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला होता.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Kadamराम कदमShiv Senaशिवसेना