शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Ram Kadam : "बाळासाहेबांना काय वाटत असेल, नातू आणि पूत्र काँग्रेसच्या पाठीमागे फरफटत चाललेत"; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 12:24 IST

BJP Ram Kadam slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करणारा हल्लाबोल मोर्चा एकीकडे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपकडून माफी मांगो आंदोलन करण्यात येत आहे.  हल्लाबोल मोर्चातून महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करत आहे. महापुरुषांचा अवमान, सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांसाठी हा मोर्चा निघाला असून पोलिसांनी काही अटी शर्थींसह परवानगी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईभर ‘माफी मांगो’ आंदोलन करत आहेत. याच दरम्यान भाजपाने खोचक टोला लगावला आहे.

"नागपूरला भाड्याची·का होईना गर्दी जमणार नाही म्हणून की काय नागपूर सोडून मुंबईला मोर्चा?" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "स्वर्गीय बाळासाहेबांना काय वाटत असेल... ज्यांनी संपूर्ण हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दुश्मनी केली... अन् आज त्यांचे नातू आणि पूत्र त्याच काँग्रेसच्या पाठीमागे फरफटत चाललेत..." असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते राम कदम (BJP Ram Kadam) यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

राम कदम यांनी "सोमवारपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे... आजपर्यंत कधीही विरोधी पक्ष  असो वा अन्य कोणीही संघटना... जिथे अधिवेशन तिथेच मोर्चा काढतात... मात्र महाविकास आघाडी जी केवल महाराष्ट्रातल्या केवळ काही जिल्ह्यापूरती किरकोळ शिल्लक असल्यामुळे की काय... नागपूरला भाड्याची·का होईना गर्दी जमणार नाही म्हणून की काय नागपूर सोडून मुंबईला मोर्चा?" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"असो... स्वर्गीय बाळासाहेबांना काय वाटत असेल... ज्यांनी संपूर्ण हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दुश्मनी केली... अन् आज त्यांचे नातू आणि पूत्र त्याच काँग्रेसच्या पाठीमागे फरफटत चाललेत...हे मात्र निश्चित स्वर्गातूनही बाळासाहेब... त्यांचे विचार पुढे  नेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अन् त्यांच्या बहादूर शिलेदारांनाच आशीर्वाद देत आहेत..." असं देखील राम कदम यांनी म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ram Kadamराम कदमBJPभाजपाAditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे