शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

“मनोज जरांगे यांची भूमिका अन् मागणी योग्य नाही”; भाजप नेत्यांने स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 21:54 IST

Radhakrishna Vikhe Patil Vs Manoj Jarange Patil: मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. पाठिंबा मिळत आहे. याला विरोध करण्याचे काही कारण नाही. पण...; भाजप नेते स्पष्टच बोलले.

Radhakrishna Vikhe Patil Vs Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत असून, राज्यातील ठिकठिकाणी ते सभा घेत आहेत. मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा घेतली. या सभेनंतर प्रतिक्रिया उमटत असून, मनोज जरांगे यांची भूमिका आणि मागणी योग्य नसल्याचे एका भाजप नेत्याने म्हटले आहे. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. १० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यापेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नाही. आता मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. आम्हाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये टिकणारे आरक्षण हवे आहे. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. यावर भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाष्य केले. 

मनोज जरांगे यांची भूमिका अन् मागणी योग्य नाही

मराठा आरक्षणास आमचा विरोध नाही, पण संबंधित आरक्षण ओबीसी प्रवर्गातून देण्याची मागणी करणे योग्य नाही. मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतली आहे, ती योग्य नाही. ते कधी ओबीसीतून आरक्षण मागतायत तर कधी कुणबी दाखले मागतायत. अशा वेगवेगळ्या मागण्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून पुढे येतायत. मुळात आम्हाला कुणाचे आरक्षण नको आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे, ही मागणी मराठा आंदोलकांची होती, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या काळात गायकवाड आयोगाची स्थापना करून मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवला होता. त्याला स्थगिती मिळाली नाही. दुर्दैवाने मराठा समाजाचे जे आरक्षण गेले आहे, ते महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा मिळत आहे. याला कुणी विरोध करण्याचे काही कारण नाही. पण माझी अट एवढीच आहे की, आपण ओबीसीमधून जे आरक्षण मागत आहात, ते योग्य नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मराठा समाजाची मागणी स्वतंत्रपणे आरक्षण मिळाले पाहिजे, कुणाच्या आरक्षणात आम्हाला भागीदारी नको, अशी आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील