शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 11:40 IST

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. तर भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. त्यासाठी तिन्ही पक्षातील किमान 25 आमदारांनी बंडखोरी करणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.  

मुंबई - उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ ३० तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर उघड मतदान घेऊन थेट प्रक्षेपण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे फुटीच्या तयारीत असलेल्या आमदारांची गोची होणार आहे. तर भाजपसमोर बहुमत सिद्ध करण्यासाठी अशक्यप्राय आव्हान उभे ठाकले आहे. 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार अशी स्थिती असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ऐनवेळी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार एकटे पडले. या स्थितीतून बाहेर निघण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. 

दरम्यान विधानसभेत तातडीनं बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं याचिका दाखल केली होती. शनिवारी रात्री दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर रविवारपासून सुनावणी सुरू झाली. आज यावर निकाल देताना न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. उद्या संध्याकाळी ५ वाजता विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या. बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले आहेत. 

थेट प्रक्षेपणामुळे फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या आमदारांची गोची होणार आहे. अर्थात पक्षविरोधी भूमिका घेतल्यास आमदारांच्या प्रतीमेला त्यांच्या मतदार संघात धक्का बसणार आहे. त्यामुळे आमदारांच्या मनात बंडखोरी करण्याची हिंमत होणे अवघड आहे. येथेच भाजपसाठी अडचण निर्माण होऊ शकते. याचे कारण म्हणजे, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. तर भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. त्यासाठी तिन्ही पक्षातील किमान 25 आमदारांनी बंडखोरी करणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.