शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 11:40 IST

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. तर भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. त्यासाठी तिन्ही पक्षातील किमान 25 आमदारांनी बंडखोरी करणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.  

मुंबई - उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ ३० तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर उघड मतदान घेऊन थेट प्रक्षेपण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे फुटीच्या तयारीत असलेल्या आमदारांची गोची होणार आहे. तर भाजपसमोर बहुमत सिद्ध करण्यासाठी अशक्यप्राय आव्हान उभे ठाकले आहे. 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार अशी स्थिती असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ऐनवेळी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार एकटे पडले. या स्थितीतून बाहेर निघण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. 

दरम्यान विधानसभेत तातडीनं बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं याचिका दाखल केली होती. शनिवारी रात्री दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर रविवारपासून सुनावणी सुरू झाली. आज यावर निकाल देताना न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. उद्या संध्याकाळी ५ वाजता विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या. बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले आहेत. 

थेट प्रक्षेपणामुळे फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या आमदारांची गोची होणार आहे. अर्थात पक्षविरोधी भूमिका घेतल्यास आमदारांच्या प्रतीमेला त्यांच्या मतदार संघात धक्का बसणार आहे. त्यामुळे आमदारांच्या मनात बंडखोरी करण्याची हिंमत होणे अवघड आहे. येथेच भाजपसाठी अडचण निर्माण होऊ शकते. याचे कारण म्हणजे, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. तर भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. त्यासाठी तिन्ही पक्षातील किमान 25 आमदारांनी बंडखोरी करणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.