शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 11:40 IST

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. तर भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. त्यासाठी तिन्ही पक्षातील किमान 25 आमदारांनी बंडखोरी करणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.  

मुंबई - उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ ३० तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर उघड मतदान घेऊन थेट प्रक्षेपण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे फुटीच्या तयारीत असलेल्या आमदारांची गोची होणार आहे. तर भाजपसमोर बहुमत सिद्ध करण्यासाठी अशक्यप्राय आव्हान उभे ठाकले आहे. 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार अशी स्थिती असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ऐनवेळी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार एकटे पडले. या स्थितीतून बाहेर निघण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. 

दरम्यान विधानसभेत तातडीनं बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं याचिका दाखल केली होती. शनिवारी रात्री दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर रविवारपासून सुनावणी सुरू झाली. आज यावर निकाल देताना न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. उद्या संध्याकाळी ५ वाजता विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या. बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले आहेत. 

थेट प्रक्षेपणामुळे फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या आमदारांची गोची होणार आहे. अर्थात पक्षविरोधी भूमिका घेतल्यास आमदारांच्या प्रतीमेला त्यांच्या मतदार संघात धक्का बसणार आहे. त्यामुळे आमदारांच्या मनात बंडखोरी करण्याची हिंमत होणे अवघड आहे. येथेच भाजपसाठी अडचण निर्माण होऊ शकते. याचे कारण म्हणजे, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. तर भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. त्यासाठी तिन्ही पक्षातील किमान 25 आमदारांनी बंडखोरी करणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.