शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

"कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने संपत असतो"; भाजपाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 18:24 IST

BJP Pravin Darekar Slams Uddhav Thackeray : "कोणी कोणाला संपवत नसतं. ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिला आहे, त्या विचारधारेशी प्रतारणा केल्यावरच तो पक्ष संपत असतो. हा देशातला इतिहास आहे."

मुंबई - उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला आहे. शिवसेना फोडण्याचा नाही, तर हा संपविण्याचा डाव आहे. मात्र, शिवसेना पुरुन उरेल आणि संपविणाऱ्यांना पाताळात गाडेल, अशा शब्दांत भाजपावर हल्लाबोल केला. "अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आजचा जो प्रयत्न आहे तो फोडण्याचा नाही, तर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नातं त्यांना तोडायचं आहे. पण नातं जर तोडायचं असेल तर हे जे आज स्वत:ला मर्द समजत आहेत. हे बंडखोर नाहीत ते हरामखोर आहेत. त्यांनी हरामीपणा केला आहे. तुमच्यात एवढी जर मर्दुमकी असेल तर निवडणुकीला सामोरं जा" असं उद्धव ठाकरे म्हणाले. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने संपत असतो" असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. "कोणी कोणाला संपवत नसतं. ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिला आहे, त्या विचारधारेशी प्रतारणा केल्यावरच तो पक्ष संपत असतो. हा देशातला इतिहास आहे. हिंदुत्व शिवसेनेची मूळ विचारधारा होती, त्याला तिलांजली दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीने आयुष्यभर हिंदुत्वाचा तिरस्कार केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या भूमिकेचा तिरस्कार केला. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या मांडील मांडी लावून बसलात, त्याचवेळी शिवसेनेची अधोगती सुरू झाली. त्यामुळे कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने, कृत्यानं संपत असतो" असं प्रवीण दरेकर य़ांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला देखील लगावला आहे. पुन्हा नव्याने शपथपत्र घेऊन पक्ष घट्ट करण्याचा प्रयत्न आहे. पण सत्ता असताना जनतेत गेले असते, फिरले असते तर गठ्ठे करण्याची वेळ आली नसती असं म्हटलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून ती २६ आणि २७ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा टीझर प्रसिद्ध केला आहे. उद्धव ठाकरे स्वत: सुरतला गेले असते तर..? फुटीर लोकांनी विनंती केली आम्हाला गद्दार म्हणू नका. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असता का? तुमची मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती? फुटीरांचा आक्षेप हाच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले? मुंबईचा घात करणारी योजना आपल्याला दिसतेय का? असे रोखठोक प्रश्न राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारले. यावरून आता भाजपाने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. 

"उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात"

"उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपा नेते निलेश राणे (BJP Nilesh N Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन फोटो ट्वीट करत जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनीच घेतलेली आधीची मुलाखत आणि आताची मुलाखत असे दोन फोटो राणे यांनी ट्वीट केले आहेत. सत्ता होती तेव्हाची मुलाखत आणि सत्ता गेल्यानंतरची मुलाखत असं म्हणत त्यांनी ते दोन फोटो शेअर केले आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं असून "उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात" असं म्हटलं आहे.  

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे