शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

Maharashtra Political Crisis: “शिवसेनेनं २५ वर्ष मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्यावं”; भाजपची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 16:17 IST

Maharashtra Political Crisis: बाळासाहेबांना मुंबईबाबत संकल्पना होत्या, त्याच फडणवीस-शिंदे सरकारच्या आहेत, असे भाजपने म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: मुंबईसह ठाणे, पुणे आणि अन्य महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला हळूहळू सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. यातच शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याच्या चर्चा आहेत. भाजप आणि शिंदे गट एकत्रित निवडणुका लढवणार असल्याने उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेनेने २५ वर्षे मुंबई गिळली आहे. मुंबईकरांना काय दिले याचे उत्तर द्यावे, अशी विचारणा भाजपने केली आहे. 

भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. मला वाटते पंचवीस वर्षे मुंबई त्यांनी गिळली. मुंबई हे सोन्याची अंडी देणारी कोंबडी हे समजण्यात आले. मुंबईकरांच्या हाती काय दिले. याचे पहिले उत्तर द्या. शिंदे हे शिवसैनिक होते आणि आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचे कडवट विचारांचे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांना मुंबईच्या ज्या संकल्पना होत्या, त्याच फडणवीस-शिंदे सरकारच्या आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

दररोज अशा प्रकारे काहीतरी बोलत आहेत

महाराष्ट्रीय राजकीय संस्कृती, परंपरा अशा प्रकारचे टोमणे. मत्सराने बोलणे हे अलीकडच्या काळात वाढत आहे. हे राजकारणाला शोभा देणार नाही. त्यामुळे ते वैफल्याने एवढे ग्रासले आहेत. त्यामुळे ते दररोज अशा प्रकारे काहीतरी बोलत आहेत, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी हल्लाबोल केला. तसेच आताच हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणार सरकार आहे. यापूर्वीच सरकार हे अफजल खानाच्या विचाराचे सरकार होते. तशाप्रकारची सरकारची मनोवृत्ती होती, असा घणाघात दरेकर यांनी केला. 

चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे

दृष्टी तशी सृष्टी दिसते. त्यामुळे चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे. खेळाचा दर्जा देण्याची आवश्यकता असेल तर त्यांनाही दिला जाईल. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अतिवृष्टीनंतर दुसऱ्याचे दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांना मदत जाहीर केली. वेगवेगळ्या घोषणा केली. शेतकऱ्यांची काळजी घेऊ. काळजी करण्याचे काही कारण नाही. विरोधकांकडे चांगल्या सूचना असतील, त्याही स्वीकारल्या जातील. अन्यथा विरोधक त्यांचे काम करतील, असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळpravin darekarप्रवीण दरेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना