शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

Maharashtra Political Crisis: “शिवसेनेनं २५ वर्ष मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्यावं”; भाजपची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 16:17 IST

Maharashtra Political Crisis: बाळासाहेबांना मुंबईबाबत संकल्पना होत्या, त्याच फडणवीस-शिंदे सरकारच्या आहेत, असे भाजपने म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: मुंबईसह ठाणे, पुणे आणि अन्य महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला हळूहळू सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. यातच शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याच्या चर्चा आहेत. भाजप आणि शिंदे गट एकत्रित निवडणुका लढवणार असल्याने उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेनेने २५ वर्षे मुंबई गिळली आहे. मुंबईकरांना काय दिले याचे उत्तर द्यावे, अशी विचारणा भाजपने केली आहे. 

भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. मला वाटते पंचवीस वर्षे मुंबई त्यांनी गिळली. मुंबई हे सोन्याची अंडी देणारी कोंबडी हे समजण्यात आले. मुंबईकरांच्या हाती काय दिले. याचे पहिले उत्तर द्या. शिंदे हे शिवसैनिक होते आणि आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचे कडवट विचारांचे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांना मुंबईच्या ज्या संकल्पना होत्या, त्याच फडणवीस-शिंदे सरकारच्या आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

दररोज अशा प्रकारे काहीतरी बोलत आहेत

महाराष्ट्रीय राजकीय संस्कृती, परंपरा अशा प्रकारचे टोमणे. मत्सराने बोलणे हे अलीकडच्या काळात वाढत आहे. हे राजकारणाला शोभा देणार नाही. त्यामुळे ते वैफल्याने एवढे ग्रासले आहेत. त्यामुळे ते दररोज अशा प्रकारे काहीतरी बोलत आहेत, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी हल्लाबोल केला. तसेच आताच हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणार सरकार आहे. यापूर्वीच सरकार हे अफजल खानाच्या विचाराचे सरकार होते. तशाप्रकारची सरकारची मनोवृत्ती होती, असा घणाघात दरेकर यांनी केला. 

चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे

दृष्टी तशी सृष्टी दिसते. त्यामुळे चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे. खेळाचा दर्जा देण्याची आवश्यकता असेल तर त्यांनाही दिला जाईल. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अतिवृष्टीनंतर दुसऱ्याचे दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांना मदत जाहीर केली. वेगवेगळ्या घोषणा केली. शेतकऱ्यांची काळजी घेऊ. काळजी करण्याचे काही कारण नाही. विरोधकांकडे चांगल्या सूचना असतील, त्याही स्वीकारल्या जातील. अन्यथा विरोधक त्यांचे काम करतील, असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळpravin darekarप्रवीण दरेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना