शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

काळाचा महिमा : २०१४ मध्ये भाजपला १३० जागा नाकारणाऱ्या शिवसेनेला ११५ जागांची ऑफर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 17:30 IST

२०१४ मध्ये भाजपची जी स्थिती आहे, तीच स्थिती २०१४ मध्ये शिवसेनेची होती. परंतु, काळाचा महिमा मोठा विचित्र असतो, अस म्हणतात. तसंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती अनेक वर्षांपासून आहे. मात्र या युतीला २०१४ विधानसभा निवडणूक अपवाद ठरली. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यातील मोठा भाऊ, छोटा भाऊ वाद चांगलाच गाजला होता. परंतु, निकालानंतर भाजपच मोठा भाऊ ठरला. त्यानुसार भाजपने सत्ता स्थापन करून शिवसेनेला सोबतही घेतले. आता विधानसभा निवडणूक जवळ आली असून पुन्हा एकदा भाजप-शिवसेना यांच्यात जागा वाटपाची बोलणी सुरू झाली आहे. यावेळची बोलणीही गेल्या वेळीप्रमाणेच सुरू आहे. केवळ पक्षांची जागा बदलली आहे. त्यामुळे युतीचं भवितव्य सांगण्याचं धारिष्ट्य कोणी दाखविणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यात भाजपसाठी पोषक वातावरण केले आहे. त्याचवेळी शिवसेनेला सोबत घेण्याची इच्छाही मुख्यमंत्र्यांची आहे. मात्र शिवसेनेला द्यावयाच्या जागांवरून भाजपमध्ये विचारमंथन सुरू आहे. किंबहुना शिवसेनेला ११० ते ११५ जागांचा पर्याय भाजपकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. अशा स्थितीत शिवसेना यावर काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला छोट्या भावाचीच वागणूक द्यायची, अशी योजना भाजपची आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत देखील असाच पेच होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला १३० हून अधिक जागा देण्याच्या भूमिकेत नव्हते. त्यावेळी भाजपची मागणी केवळ १२७ ते १३० जागांची होती. त्याला देखील शिवसेनेने प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे अखेर शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते. तेव्हा मोदी लाटेत भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता.

दरम्यान २०१४ मध्ये भाजपची जी स्थिती आहे, तीच स्थिती २०१४ मध्ये शिवसेनेची होती. परंतु, काळाचा महिमा मोठा विचित्र असतो, अस म्हणतात. तसंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. फरक एवढाच आहे की, यावेळी शिवसेना बॅकफूटला दिसत आहे. तर भाजप फॉर्मात आहे. मात्र दोघांमध्ये कोण सरस हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.