शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

काळाचा महिमा : २०१४ मध्ये भाजपला १३० जागा नाकारणाऱ्या शिवसेनेला ११५ जागांची ऑफर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 17:30 IST

२०१४ मध्ये भाजपची जी स्थिती आहे, तीच स्थिती २०१४ मध्ये शिवसेनेची होती. परंतु, काळाचा महिमा मोठा विचित्र असतो, अस म्हणतात. तसंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती अनेक वर्षांपासून आहे. मात्र या युतीला २०१४ विधानसभा निवडणूक अपवाद ठरली. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यातील मोठा भाऊ, छोटा भाऊ वाद चांगलाच गाजला होता. परंतु, निकालानंतर भाजपच मोठा भाऊ ठरला. त्यानुसार भाजपने सत्ता स्थापन करून शिवसेनेला सोबतही घेतले. आता विधानसभा निवडणूक जवळ आली असून पुन्हा एकदा भाजप-शिवसेना यांच्यात जागा वाटपाची बोलणी सुरू झाली आहे. यावेळची बोलणीही गेल्या वेळीप्रमाणेच सुरू आहे. केवळ पक्षांची जागा बदलली आहे. त्यामुळे युतीचं भवितव्य सांगण्याचं धारिष्ट्य कोणी दाखविणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यात भाजपसाठी पोषक वातावरण केले आहे. त्याचवेळी शिवसेनेला सोबत घेण्याची इच्छाही मुख्यमंत्र्यांची आहे. मात्र शिवसेनेला द्यावयाच्या जागांवरून भाजपमध्ये विचारमंथन सुरू आहे. किंबहुना शिवसेनेला ११० ते ११५ जागांचा पर्याय भाजपकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. अशा स्थितीत शिवसेना यावर काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला छोट्या भावाचीच वागणूक द्यायची, अशी योजना भाजपची आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत देखील असाच पेच होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला १३० हून अधिक जागा देण्याच्या भूमिकेत नव्हते. त्यावेळी भाजपची मागणी केवळ १२७ ते १३० जागांची होती. त्याला देखील शिवसेनेने प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे अखेर शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते. तेव्हा मोदी लाटेत भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता.

दरम्यान २०१४ मध्ये भाजपची जी स्थिती आहे, तीच स्थिती २०१४ मध्ये शिवसेनेची होती. परंतु, काळाचा महिमा मोठा विचित्र असतो, अस म्हणतात. तसंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. फरक एवढाच आहे की, यावेळी शिवसेना बॅकफूटला दिसत आहे. तर भाजप फॉर्मात आहे. मात्र दोघांमध्ये कोण सरस हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.