शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

काळाचा महिमा : २०१४ मध्ये भाजपला १३० जागा नाकारणाऱ्या शिवसेनेला ११५ जागांची ऑफर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 17:30 IST

२०१४ मध्ये भाजपची जी स्थिती आहे, तीच स्थिती २०१४ मध्ये शिवसेनेची होती. परंतु, काळाचा महिमा मोठा विचित्र असतो, अस म्हणतात. तसंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती अनेक वर्षांपासून आहे. मात्र या युतीला २०१४ विधानसभा निवडणूक अपवाद ठरली. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यातील मोठा भाऊ, छोटा भाऊ वाद चांगलाच गाजला होता. परंतु, निकालानंतर भाजपच मोठा भाऊ ठरला. त्यानुसार भाजपने सत्ता स्थापन करून शिवसेनेला सोबतही घेतले. आता विधानसभा निवडणूक जवळ आली असून पुन्हा एकदा भाजप-शिवसेना यांच्यात जागा वाटपाची बोलणी सुरू झाली आहे. यावेळची बोलणीही गेल्या वेळीप्रमाणेच सुरू आहे. केवळ पक्षांची जागा बदलली आहे. त्यामुळे युतीचं भवितव्य सांगण्याचं धारिष्ट्य कोणी दाखविणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यात भाजपसाठी पोषक वातावरण केले आहे. त्याचवेळी शिवसेनेला सोबत घेण्याची इच्छाही मुख्यमंत्र्यांची आहे. मात्र शिवसेनेला द्यावयाच्या जागांवरून भाजपमध्ये विचारमंथन सुरू आहे. किंबहुना शिवसेनेला ११० ते ११५ जागांचा पर्याय भाजपकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. अशा स्थितीत शिवसेना यावर काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला छोट्या भावाचीच वागणूक द्यायची, अशी योजना भाजपची आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत देखील असाच पेच होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला १३० हून अधिक जागा देण्याच्या भूमिकेत नव्हते. त्यावेळी भाजपची मागणी केवळ १२७ ते १३० जागांची होती. त्याला देखील शिवसेनेने प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे अखेर शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते. तेव्हा मोदी लाटेत भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता.

दरम्यान २०१४ मध्ये भाजपची जी स्थिती आहे, तीच स्थिती २०१४ मध्ये शिवसेनेची होती. परंतु, काळाचा महिमा मोठा विचित्र असतो, अस म्हणतात. तसंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. फरक एवढाच आहे की, यावेळी शिवसेना बॅकफूटला दिसत आहे. तर भाजप फॉर्मात आहे. मात्र दोघांमध्ये कोण सरस हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.