शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

भाजपची लहान भावासाठीही तडजोड नाहीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 13:16 IST

भाजप देखील लहान भावासाठी कुठलीही तडजोड करण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युतीतील भावा-भावाचे नाते केवळ घोषणेपुरतेच होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 15 दिवस उलटून गेले आहे. मात्र अद्याप एकाही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवटीचे सावट आहे. शिवसेना-भाजप सरकार स्थापन करेल अशी शक्यता शुक्रवापर्यंत होती. मात्र ही शक्यता देखील आता मावळली आहे. 

जागा वाटपात लहान भाऊ झालेल्या शिवसेनेला राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. तर भाजप शतक पार करून मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर भाजपकडून दावा करण्यात येत आहे. मात्र शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. आता हा पेच सोडवणे उभय पक्षांसाठी कठिण झाल्याचे दिसत आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत शिवसेना आणि भाजपची युती निश्चित झाली होती. यावेळी भाजपने आमच्या सर्व अटी मान्य केल्याचा दावा शिवसेनेने केला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील सत्तेचं समसमान वाटप होईल असं म्हटलं होतं. आता मात्र मुख्यमंत्रीपद विभागण्याची योजना नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  प्रचार सभेला शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी मोदींनी उद्धव यांना लहान भाऊ असं संबोधले होते. मात्र राज्यातील सत्तास्थापनेच्या वेळी उद्धव लहान भाऊ राहिले नाही का ? किंबहुना भाजप देखील लहान भावासाठी कुठलीही तडजोड करण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युतीतील भावा-भावाचे नाते केवळ घोषणेपुरतेच होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.