शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

Maharashtra Politics: “कसाबप्रमाणे राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन् पाकिस्तानात पाठवून द्या”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 12:11 IST

Maharashtra Politics: आधी ओबीसी समाजाचा अपमान करायचा. कायद्याने आपले काम केल्यावर भाजपच्या नावाने बोंबलायचे, हा कोणता प्रकार? अशी सवल करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर लगेचच जामीनही दिला. यानंतर देशभरात काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून, भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे. यातच भाजप नेत्यांकडूनही काँग्रेसवर पलटवार करण्यात येत आहे. 

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. तसेच कसाबप्रमाणे राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि पाकिस्तानात पाठवून द्या, या शब्दांत राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी यांना तसे विधान करायला आम्ही सांगितले नव्हते. किंवा या विधानाविरोधात याचिका दाखल करण्यासही भाजपने सांगितले नव्हते. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला. मोदी आडनावाचा अपमान केला. कायद्याने आपले काम केल्यावर भाजपच्या नावाने बोंबलायचे, हा कोणता प्रकार, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली.

सांगलीसह महाराष्ट्रात लँड जिहाद सुरू असल्याचा दावा

नितेश राणे यांनी सांगलीसह महाराष्ट्रात लँड जिहाद सुरू असल्याचा दावा केला. अनधिकृत धार्मिक स्थळ उभी करायची. जेणेकरुन हिंदू तिथून निघून जातील, असा प्रकार राज्यात सुरू आहे. मुद्दा यावर कारवाईचा आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले. तसेच नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी आम्ही करत आहोत. सामान्य लोकांना याची माहिती व्हावी, यासाठी व्याख्यान आणि प्रबोधनातून प्रयत्न केला जात आहे. जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमी लव्ह जिहादची खोटी आकडेवारी देत असल्याचा दावाही नितेश राणे यांनी यावेळी केला. 

दरम्यान, हिंदू समाज धर्मासाठी कुणावर जबरदस्ती करत नाही. धर्मांतर विरोधात सुरू असलेली ही लढाई सोपी नाही. लव्ह जिहादच्या असंख्य केसेस पोलीस आणि समाजासमोर येऊ शकल्या नाहीत. मुस्लिम तरुण हिंदू आहे म्हणून खोटं सांगून हिंदू मुलींशी लग्न करतात. लव्ह जिहाद करण्यासाठी मुस्लिम तरुणांना लाखो-करोडो रुपये दिले जातात. लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र करणार म्हणजे करणार. महाराष्ट्र सर्वांत कडक धर्मांतर विरोधी कायदा आपल्याला पाहायला मिळेल, असे नितेश राणे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Rahul Gandhiराहुल गांधी