शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

“उद्धव ठाकरे फोटोसेशनसाठी इर्शाळवाडीत गेले, तुम्ही CM असताना काय केले याचे उत्तर द्यावे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 18:35 IST

Raigad Irshalwadi Landslide Incident: चित्रपट संपायला आला आणि हे पोहोचले आहेत. त्याचा काही उपयोग नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

Raigad Irshalwadi Landslide Incident: खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे, सोबतच धुके असल्याने बचाव व शोधमोहिमेला अडचणी येत आहेत. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली आणि दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन केले. मात्र, यावरून उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे. 

पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत तुम्हा सगळ्याचे पुनर्वसन होत नाही, तुमचे आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्या मदतीसाठी आहोत. तसेच यामध्ये कुठेही राजकरण येऊ देणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी ग्रामस्थांना दिले आहे. याशिवाय, सध्याचे क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्रात येत असल्याने त्या संदर्भात सरकारसोबत संवाद साधणार आहे. मी सरकारकडे जायला तयार आहे, यामध्ये मला कोणताही कमीपणा येणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. यावर भाजप नेते आणि आमदार नीतेश राणे यांनी प्रत्युत्तर देताना टीकास्त्र सोडले आहे. 

उद्धव ठाकरे फोटोसेशनसाठी इर्शाळवाडीत गेले

तुम्ही मुख्यमंत्री असताना काय मदत केली, याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे. ते फोटोसेशन करण्यासाठी दुर्घटनाग्रस्त भागात जात असतील. त्याचा काही उपयोग नाही. चित्रपट संपायला आला आणि हे पोहोचले आहेत. विनायक राऊत हे कोकणचे संकट आहे. मतदारांना विनंती आहे की, २०२४ मध्ये हे संकट दूर करावे, या शब्दांत नीतेश राणे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, मणिपूर घटनेतील राक्षसांना कठोर शिक्षा मिळणार आणि त्याची कारवाई सुरु झाली झाली आहे. मणिपूर घटनेवर बोलणारे विरोधी लोक जोधपूर घटनेवर बोलतील का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्यासाठी ते बोलत आहेत. या देशाला विकसित कोण करू शकतो, रक्षण कोण करू शकतो, हे भारतातील महिलांना माहिती आहे. काँग्रेसच्या महिला आमदारांनी देशातील इतर घटनांवर पण बोलावे. फक्त मोदी द्वेष आणि भाजप द्वेष करत असल्यामुळे हे असं बोललं जात आहे. तुमचे राहुल गांधी बोलण्याची हिंमत दाखवतील का? वेळ आणि तारीख सांगा आम्ही तुम्हाला सिनेमे दाखवतो, असे आव्हान नितेश राणे यांनी ठाकरे गटाला दिले. 

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे