शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

'४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 12:54 IST

"जो हिंदू हित की बात करेगा, वह महाराष्ट्र पर राज करेगा," असेही ते म्हणाले

T. Raja Singh, India as Hindu Nation: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. दोन महिन्यांच्या धामधुमीनंतर ४ जूनला निकाल लागले. त्यात भाजपाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. पण भाजपाने NDA तील मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापना केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भारतात सरकार स्थापन झाले. पण असे असले तरी भाजपाच्या नेतेमंडळींकडून आजही विधाने करताना दिसतात. तशातच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे भाजपचे आमदार टी राजा सिंह यांनी एक मोठा दावा केला आहे.

भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी भिवंडी येथे आयोजित केलेल्या धर्मसभेला हजेरी लावली. या धर्मसभेत वेगवेगळे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी जाहीर भाषणात बोलताना टी राजा सिंह यांनी 'हिंदूराष्ट्रा'बाबत एक विधान केले. "लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पार जागा जिंकल्या असत्या तर आपला भारत देश नक्कीच हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," असा दावा टी राजा सिंह यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, "मुस्लिमांकडून लव्ह जिहाद राबवला जातो. महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतर यावर कायदा का होत नाही? हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदूराष्ट्र होणार नाही. वक्फ बोर्ड रद्द करावा. महाराष्ट्रात १ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात १० लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावी."

"महाराष्ट्रातील हिंदुत्त्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाचे भय आहे? त्यांच्या मागे सर्व हिंदू समाज उभा आहे. त्यांनी मलंगगड मुक्त केला पाहिजे. मलंगगडला मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. पण तो दर्गा असल्याचे सांगून हिंदूंची थट्टा केली जाते. हा मलंगगड मुक्त झाला पाहिजे. जो हिंदू हित की बात करेगा, वह महाराष्ट्र पर राज करेगा," असेही ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाIndiaभारतHinduहिंदूbhiwandiभिवंडीMLAआमदार