शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

'४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 12:54 IST

"जो हिंदू हित की बात करेगा, वह महाराष्ट्र पर राज करेगा," असेही ते म्हणाले

T. Raja Singh, India as Hindu Nation: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. दोन महिन्यांच्या धामधुमीनंतर ४ जूनला निकाल लागले. त्यात भाजपाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. पण भाजपाने NDA तील मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापना केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भारतात सरकार स्थापन झाले. पण असे असले तरी भाजपाच्या नेतेमंडळींकडून आजही विधाने करताना दिसतात. तशातच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे भाजपचे आमदार टी राजा सिंह यांनी एक मोठा दावा केला आहे.

भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी भिवंडी येथे आयोजित केलेल्या धर्मसभेला हजेरी लावली. या धर्मसभेत वेगवेगळे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी जाहीर भाषणात बोलताना टी राजा सिंह यांनी 'हिंदूराष्ट्रा'बाबत एक विधान केले. "लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पार जागा जिंकल्या असत्या तर आपला भारत देश नक्कीच हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," असा दावा टी राजा सिंह यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, "मुस्लिमांकडून लव्ह जिहाद राबवला जातो. महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतर यावर कायदा का होत नाही? हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदूराष्ट्र होणार नाही. वक्फ बोर्ड रद्द करावा. महाराष्ट्रात १ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात १० लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावी."

"महाराष्ट्रातील हिंदुत्त्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाचे भय आहे? त्यांच्या मागे सर्व हिंदू समाज उभा आहे. त्यांनी मलंगगड मुक्त केला पाहिजे. मलंगगडला मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. पण तो दर्गा असल्याचे सांगून हिंदूंची थट्टा केली जाते. हा मलंगगड मुक्त झाला पाहिजे. जो हिंदू हित की बात करेगा, वह महाराष्ट्र पर राज करेगा," असेही ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाIndiaभारतHinduहिंदूbhiwandiभिवंडीMLAआमदार