शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

विरप्पनसारखा अभिनंदन पंतप्रधान मोदींमुळे मायदेशात परतला; भाजपा आमदाराची मुक्ताफळं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 9:48 PM

भाजपा आमदार सुरेश धस बरळले 

औरंगाबाद: भारतीय हवाई दलातील विरप्पनसारखा अभिनंदन वर्धमान पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अवघ्या 60 तासात मायदेशी परतला, अशी मुक्ताफळं भाजपा आमदार सुरेश धस यांनी उधळली. विरप्पनसारखा अभिनंदन परतला, हे मोदींच्या धोरणाचं आणि खंबीर नेतृत्त्वाचं लक्षण असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी औरंगाबादमध्ये केलं. यानंतर आपण विरप्पन आणि अभिनंदन यांची तुलना करत नसल्याचं सांगत धस यांनी सारवासारव केली. 14 फेब्रुवारीला पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केला. 26 फेब्रुवारीला भारतानं एअर स्ट्राइक केल्यावर 27 तारखेला पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय हवाई दलानं उधळून लावला. त्यावेळी आकाशात दोन्ही हवाई दलांच्या विमानांची चकमक झाली. त्यावेळी मिग-21 मधील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 विमान पाडलं. मात्र त्यानंतर अभिनंदन यांचं विमान कोसळलं. त्याआधी त्यांनी स्वत:ची विमानातून सुटका केली. मात्र ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिकांच्य हाती लागले. जवळपास 60 तास ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. 1 मार्चला ते वाघा बॉर्डरवरुन मायदेशी परतले. धस यांच्याआधी प्रदेशाध्यक्ष दानवे बरळलेभाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 5 एप्रिलला पुलवामा हल्ल्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. जालना लोकसभा मतदारसंघातील रामनगरमध्ये रावसाहेब दानवे प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते. उद्धाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पुलवामात आपल्या देशाचे 42 अतिरेकी मारले गेल्याचं म्हटलं. रावसाहेब दानवेंनी जवानांना दहशतवादी संबोधलं. त्यामुळे रावसाहेब दानवेंना दहशतवादी आणि जवान यातील फरकच समजत नाही काय, असाही प्रश्न आता उपस्थित केला गेला. विशेष म्हणजे दानवेंनी दुसऱ्यांदा ही चूक केली. मार्चमध्येही दानवेंनी जवानांबद्दल बोलताना अतिरेकी शब्द वापरला होता. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानSuresh Dhasसुरेश धसindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवे