शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारणार: राणा जगजितसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 11:45 IST

सरकारने २ लाख रुपयांपर्यंतची केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर, २०१९ पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधानसभेत केली. त्यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मार्च, २०२० पासून लागू होईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाळला नसून, याविरोधात शेतकऱ्यांच्या साथीने लढा उभारणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.

नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारने शेवटच्या दिवशी २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र सरकारने २ लाख रुपयांपर्यंतची केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर याच मुद्यावरून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकार स्थापन होण्यापूर्वी औरंगाबादसह मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दौरा केला होता. तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता, अटी-शर्ती बाजूला ठेवून तातडीची मदत म्हणून हेक्टरी २५ हजाराची मदत देण्याची मागणी ठाकरेंनी त्यावेळी केली होती. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना ही मदत मिळण्याची अपेक्षा होती. परंतु अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ही नुकसान भरपाई मुख्यमंत्री देऊ शकले नसल्याचा आरोप राणा जगजितसिंह यांनी केला आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत आपले सरकार आल्यावर शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. तर शेतकरी कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करण्याची घोषणा सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र शनिवारी सरकराने जाहीर केलेल्या कर्जमाफीत फक्त २ लाख रुपयांचीच माफी असणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात सरसकट कर्जमाफी व शेतकऱ्यांना २५ हजाराची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारणार असल्याचा इशारा राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.