शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारणार: राणा जगजितसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 11:45 IST

सरकारने २ लाख रुपयांपर्यंतची केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर, २०१९ पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधानसभेत केली. त्यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मार्च, २०२० पासून लागू होईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाळला नसून, याविरोधात शेतकऱ्यांच्या साथीने लढा उभारणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.

नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारने शेवटच्या दिवशी २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र सरकारने २ लाख रुपयांपर्यंतची केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर याच मुद्यावरून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकार स्थापन होण्यापूर्वी औरंगाबादसह मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दौरा केला होता. तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता, अटी-शर्ती बाजूला ठेवून तातडीची मदत म्हणून हेक्टरी २५ हजाराची मदत देण्याची मागणी ठाकरेंनी त्यावेळी केली होती. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना ही मदत मिळण्याची अपेक्षा होती. परंतु अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ही नुकसान भरपाई मुख्यमंत्री देऊ शकले नसल्याचा आरोप राणा जगजितसिंह यांनी केला आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत आपले सरकार आल्यावर शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. तर शेतकरी कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करण्याची घोषणा सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र शनिवारी सरकराने जाहीर केलेल्या कर्जमाफीत फक्त २ लाख रुपयांचीच माफी असणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात सरसकट कर्जमाफी व शेतकऱ्यांना २५ हजाराची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारणार असल्याचा इशारा राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.