शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 12:21 IST

'मातोश्री'वर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो हे नारायण राणे यांनी अनुभवलं आहे - राजेश क्षीरसागर

ठळक मुद्दे नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. "भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राजकारणात आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झाले आहेत"

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राजकारणात आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. त्यामुळे टीका करताना विचार करा, पायदळी यायला वेळ लागणार नाही, अशी टीका माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. "राजेश क्षीरसागर सारख्या भुंकणाऱ्यांना माहीत आहे.. राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही...राज्यपाल नियुक्त आमदारकीचे बिस्कीट आमच नाव घेतले की मिळेल असा गैरसमज झाला असेल.. पण रामदास कदम सारख्यांचे भुंकून किती दात उरले आणि काय अवस्था मातोश्रीने केली हे ही लक्षात ठेवावे!", असे ट्विट नितेश राणेंनी केले आहे.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील सीपीआरमध्ये बेड्स आणि कपाटांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. राज्यभर उगाच दिंडोरा पिटवून राज्यकारभार होत नाही. चंद्रकांत पाटलांना युतीचा इतिहास माहीत नसेल. गेल्या तीस वर्षांपासून भाजप आणि शिवसेना यांची युती होती. या कालावधीत 'मातोश्री'वरील नेत्यांनी कधीही माध्यमातून प्रतिक्रिया न देता केवळ आपल्या मुखपत्रातून मत व्यक्त केले. 'मातोश्री'वर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो हे नारायण राणे यांनी अनुभवलं आहे. त्यामुळे टीका करताना विचार करून करावी, असा सल्लाही राजेश क्षीरसागर यांनी दिला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत सरकार पाडून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना केले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'तुम्ही इतर वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन दाखवा' असा पलटवार केला. तसेच, 'चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहेत. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी', असे थेट आव्हानच चंद्रकात पाटील यांनी दिले होते.

आणखी बातम्या...

कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार    

अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा     

राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित

Sushant Singh Rajput death case : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चौकशी होणार!    

"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

पब्जीसह २७५ चिनी अ‍ॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत    

'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!    

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे chandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे