शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

“शरद पवारांचे नातेवाईक EVM घोटाळ्यामुळे निवडून आलेत का?”; भाजपा आमदाराचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:23 IST

Maharashtra Politics: ईव्हीएमवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.

Maharashtra Politics: मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. पहिल्याच दिवशी मविआने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. ईव्हीएमवर आरोप करत त्याविरोधातील भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावून धरली आहे. यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.

शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांतील आकडेवारी मांडली आणि काही उदाहरणे समोर ठेवली. तसेच पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असे ट्विट एक्सवर शेअर करत विरोधकांना टोला लगावला. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाला शरद पवारांनी भेट दिली. यावेळी मी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, पवार साहेबांनी हे करणे योग्य नाही. मी काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणे, तुमचे म्हणणे ऐकून घेणे चुकीचे आहे? लोकांच्या मनात काही शंका आहेत. त्याबद्दल जाणून घेणे, त्याचे निरसन करणे चुकीच आहे का? अशी विचारणा करत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. 

शरद पवारांचे नातेवाईक EVM घोटाळ्यामुळे निवडून आलेत का?

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. हम करे सो कायदा यासारखे शरद पवार वागत आहेत. शरद पवार लोकशाही मानत नाहीत. जे नातेवाईक निवडून आले ते ईव्हीएम घोटाळ्याने निवडून आलेत का? हे आता ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारत आहेत, अशी टीका पडळकर यांनी केली. 

दरम्यान, यापूर्वी झारखंड, कर्नाटकमध्ये ईव्हीएमवर मतदान झाले. आता प्रियंका गांधी जिंकल्या आहेत. जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचे आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कोणी करत नाही. हा खरा म्हणजे दुटप्पीपणा आहे. तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का? विरोधी पक्षाकडे आता कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. सर्व घटकांनी राज्यातील विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली आहे. कारण घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत. काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. विरोधी पक्षाला माझे आव्हान आहे, रडगाणं थांबवा, रडगाणे बंद करा आणि विकास गाणे सुरू करा, अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारEVM Machineईव्हीएम मशीनmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMahayutiमहायुती