शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं..."; भाजप आमदाराचा राऊतांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 12:34 IST

संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. मग, त्यांच्या नावाने सामनामध्ये लेख कसा छापून आला? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. आज त्यांची कोठडी संपत आहे. मात्र यातच, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये काल, म्हणजेच रविवारी राऊतांच्या नावाने 'रोख-ठोक' सदर प्रसिद्ध झाले. यामुळे आता राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. मग, त्यांच्या नावाने सामनामध्ये लेख कसा छापून आला? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.  

नेमके काय म्हणाले भातखळकर? -ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या संजय राऊतांना टोला लगावताना भातखळकर यांनी, "शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आगाऊपणामुळे पक्ष संपला, पण यांचा आगाऊपणा मात्र संपत नाही. ED च्या कोठडीतून रोखठोक लिहिलंय. भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं...," असे ट्विट केले आहे. 

ईडी करणार चौकशी -महत्वाचे म्हणजे, संजय राऊत हे कोठडीत असताना लेख किंवा कॉलम लिहू शकत नाहीत. न्यायालयाने त्यांना विशेष परवानगी दिली तरच ते लिहू शकतात. त्यांनी न्यायालयाकडे, अशी कुठलीही परवानगी मागितलेली नाही अथवा न्यायालयानेही त्यांनी तशी परवानगी दिलेली नाही. यामुळे राऊतांनी तुरुंगात असताना लेख लिहिला का? जर लिहिला असेल, तर तो बाहेर गेलाच कसा? याची चौकशीही ईडी करणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

काय आहे रोख-ठोकमध्ये -गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढले, तर मुंबईत एकही पैसा शिल्लक राहणार नाही आणि ती भारताची आर्थिक राजधानीही राहणार नाही, अशा राज्यपालांच्या वक्तव्यावर या लेखात टीका करण्यात आली आहे. राऊता अटक झाल्यानंतर साधारणपणे दुसऱ्या दिवशी कोश्यारी यांनी हे वक्तव्य केले होते. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAtul Bhatkhalkarअतुल भातखळकरBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShiv Senaशिवसेना