शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: सत्ता गेल्याने आयारामांना बसावे लागणार विरोधी बाकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 14:13 IST

विकासाठी भाजपमध्ये आल्याचे सांगत मेघाभार्तीत मोठे नेते भाजपच्या गोटात सामील झाले होते.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर राज्यात सुद्धा भाजपचीचं सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास भाजपला होता. तर तसं वातावरण सुद्धा पाहयला मिळत होते. त्यामुळं निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मेगाभरतीतून भाजपमध्ये सामील झाले होते. मात्र आता हातची सत्ता गेल्यानं भाजपमध्ये आलेल्या आयारामांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता आल्याने, राज्यात सुद्धा विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता येणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये महाभरती झाली.

विकासासाठी भाजपमध्ये आल्याचे सांगत मेघाभरतीत  मोठे नेते भाजपच्या गोटात सामील झाले होते. त्यात काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, नितेश राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे तर राष्ट्रवादीचे गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, बबनराव पाचपुते, प्रसाद लाड, वैभव पिचड व राणा जगजीतसिंह पाटील यांचा समावेश होता.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपेक्षप्रमाणे भाजप सर्वात मोठा पक्ष सुद्धा ठरला. मात्र आलेले निकालाचे आकडे पाहता सत्तास्थापनेची चावी शिवसनेच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले होते. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची सरकार स्थापनेचा निर्णय घेतला असून काही तासात शपथविधी सोहळा सुद्धा पार पडणार आहे.

तर सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर मोठी नामुष्की ओढवली असून, त्यांना पुन्हा एकदा विरोधातच बसावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या आयारामांना विरोधीपक्षाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.