शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Maharashtra Government: सत्ता गेल्याने आयारामांना बसावे लागणार विरोधी बाकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 14:13 IST

विकासाठी भाजपमध्ये आल्याचे सांगत मेघाभार्तीत मोठे नेते भाजपच्या गोटात सामील झाले होते.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर राज्यात सुद्धा भाजपचीचं सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास भाजपला होता. तर तसं वातावरण सुद्धा पाहयला मिळत होते. त्यामुळं निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मेगाभरतीतून भाजपमध्ये सामील झाले होते. मात्र आता हातची सत्ता गेल्यानं भाजपमध्ये आलेल्या आयारामांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता आल्याने, राज्यात सुद्धा विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता येणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये महाभरती झाली.

विकासासाठी भाजपमध्ये आल्याचे सांगत मेघाभरतीत  मोठे नेते भाजपच्या गोटात सामील झाले होते. त्यात काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, नितेश राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे तर राष्ट्रवादीचे गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, बबनराव पाचपुते, प्रसाद लाड, वैभव पिचड व राणा जगजीतसिंह पाटील यांचा समावेश होता.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपेक्षप्रमाणे भाजप सर्वात मोठा पक्ष सुद्धा ठरला. मात्र आलेले निकालाचे आकडे पाहता सत्तास्थापनेची चावी शिवसनेच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले होते. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची सरकार स्थापनेचा निर्णय घेतला असून काही तासात शपथविधी सोहळा सुद्धा पार पडणार आहे.

तर सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर मोठी नामुष्की ओढवली असून, त्यांना पुन्हा एकदा विरोधातच बसावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या आयारामांना विरोधीपक्षाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.