शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 13:18 IST

भाजप नेते राम कदम (ram kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. आहे. राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देराम कदम यांचा महाविकास आघाडी सरकारला थेट इशाराशिवजयंती साजरी करण्यावरून उद्धव ठाकरे सरकारला पत्रअन्यथा तीव्र आंदोलना करू - राम कदमांचा इशारा

मुंबई : कोरोना संकटामुळे यंदाच्या शिवजयंती उत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे गृहविभागाने नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी दिला आहे. (bjp leader ram kadam warns that allow shiv jayanti celebration otherwise else intense agitation)

भाजप नेते राम कदम (ram kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. आहे. राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ''छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी नाही? शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय ही शरमेची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे, आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का?, अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे. 

महाराष्ट्रात सातत्याने हिंदूंची गळचेपी

गेल्या काही दिवसात सातत्याने महाराष्ट्रात हिंदूंची गळचेपी होताना दिसते. पालघरमध्ये साधूंवर हल्ला झाला. मात्र, राज्य सरकारने ठोस कारवाई केली नाही. तांडव या वेबसीरिजच्या माध्यमातून हिंदू देवदेवतांचा अवमान केला. पण, सरकार गप्प बसले. आता तर शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घालून पुन्हा एकदा हिंदूंचा अवमान करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या पत्राद्वारे माझी तुम्हाला विनंती आहे की, शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राम कदम यांनी सरकारला दिला आहे.

'शिवजयंती साध्या पद्धतीनं साजरी करा, केवळ 10 व्यक्तींची उपस्थिती असावी'

शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का?

महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते. मात्र हिंदुत्ववादी स्वराज्य ज्यांनी सुरू केले. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतेय आणि ही शरमेची गोष्ट आहे. शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत, अशी विचारणा राम कदम यांनी आपल्या पत्रातून केली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणRam Kadamराम कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShivjayantiशिवजयंतीBJPभाजपा