शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?; कोरोनावरुन प्रवीण दरेकरांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 17:39 IST

pravin darekar react on corona situation: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका दरेकरांनी केलीय.

ठळक मुद्देप्रवीण दरेकर यांची राज्य सरकारवर टीकाकेंद्राने राज्यात लक्ष घालावे - दरेकरांची मागणीसरकार आणि प्रशासन झोपेतून जागे होत नाही - दरेकरांची टीका

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (pravin darekar react on corona situation in maharashtra state)

राज्याच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असताना पुन्हा लॉकडाऊन करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहत आहे का? अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली. राज्यातील एकूण राजकीय तसेच कोरोना परिस्थितीसंदर्भात प्रवीण दरेकर यांनी रोखठोक भाष्य केले. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. 

पाच हजार रुपये जमा करा, मगच टाळेबंदी लावा

सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल, तर आधी सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात, परीक्षा देणारे तरुण, छोटा व्यावसायिक, कष्टकरी, संघटित व असंघटित कामगारांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा करावे आणि मगच टाळेबंदी जाहीर करावी, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली. सर्वसामान्य जनता वाऱ्यावर पडल्याचे पाहायला मिळत आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा ढिसाळ कारभार सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका दरेकरांनी केली आहे. 

“व्याजदर कपातीबाबत सकाळी पेपर वाचल्यावर निर्मला सीतारामन यांना समजले असावे”

सरकार आणि प्रशासन झोपेतून जागे होत नाही

नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि खुद्द सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी करत नाशिकच्या दौऱ्यात आयुक्तांची भेट घेऊन बेडस, व्हेंटीलेटर उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिलं होतं. दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यानाही कल्पना दिली होती. पण हे सरकार आणि प्रशासन झोपेतून जागे होत नाही, या शब्दांत दरेकर यांनी हल्लाबोल केला.

प्रगती का हायवे! महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी; नितीन गडकरींची घोषणा

आता केंद्राने हस्तक्षेप करावा

केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक उपाययोजना केल्या, सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळेच देश पातळीवर केंद्र सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी ठरल्याचा दावा करत केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी ४०० व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत, म्हणून धूळ खात पडून आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला आमची विनंती आहे की, त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दरेकरांनी केली.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाState Governmentराज्य सरकार