शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय; राजकारणापासून २ महिने अलिप्त राहणार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:08 IST

राजकारण मी करेन नाही करेन, माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उभे केले जात आहेत. मी जे काही करेन डंके की चोट पर सर्व करेन असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

मुंबई – मी २० वर्षात कधीही सुट्टी घेतली नाही. मला आता त्याची गरज आहे. मला अंर्तमुख होण्याची गरज आहे. मी आमदार झाल्यावर माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं की, राजकारणात ज्या विचारधारेला डोळ्यासमोर मी पुढे आली. त्या विचारधारेशी मला कधी प्रतारणा करावी लागेल किंवा चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील तेव्हा मी राजकारणातून एक्झिट घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत मला एका ब्रेकची आवश्यकता आहे. तो मी घेणार आहे. मी राजकारणापासून २ महिने सुट्टी घेऊन अंर्तमुख होऊन सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहे अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात सध्या वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतायेत. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी राहिली नाही. मात्र पंडित दिनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयींची भाजपा सदैव राहावी यासाठी माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता धडपडतेय. मी नक्षलग्रस्त भागात जाऊन, अन्नपाण्याची अपेक्षा न करता पक्षासाठी काम करतेय. असं असताना माझ्या नैतिकतेवर आणि विश्वासर्हतेवर शंका निर्माण होणे याने मला दु:ख वाटते असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत राजकारण मी करेन नाही करेन, माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उभे केले जात आहेत. मी जे काही करेन डंके की चोट पर सर्व करेन. हजारो, लाखो लोक मला काय करताय असा प्रश्न करतायेत. पक्षाचा आदेश मी कायमच मानत आलीय. १०६ आमदारांच्या मनात अनेक गोष्टी आहेत. कुणी समोर येऊन बोलू शकत नाही. मी फक्त मुद्द्यांवर बोलले. कधीही नाराजी व्यक्त केली नाही. अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. माझ्यावर आरोप झाले. पण सर्वांना उत्तरे दिली. मी ईश्वर साक्ष कथन करते, मी कोणत्याही पक्षाच्या, नेत्याच्या पक्षप्रवेशासाठी कधीही भेटले नाही. मी राहुल गांधींना कधी भेटले नाही. माझे जे काही जगासमोर आहे. पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाला खूप महत्व आहे. मी नाराज नाही पण दुखी आहे. माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे मी न्यायालयात लढाई लढणार आहे असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.

काँग्रेसमध्ये जाण्याची बातमी चुकीची

२०१९ च्या निवडणुकीनंतर अनेक घटना घडल्या. मी पक्षातून बाहेर जाणार अशा चर्चा सुरू होत्या. मी वेळोवेळी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे सातत्याने माझ्याबद्दल चर्चा करणे म्हणजे माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणारे आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. पुन्हा पुन्हा भूमिका स्पष्ट करणार नाही. मी राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची बातमी छापली. बातमीसमोर प्रश्नचिन्ह लावून माझ्या विश्वासर्हतेवर बोलले जाते. या चॅनेलवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे. माझे करिअर कवडीमोलाचे नाही. २० वर्ष मी राजकारणात काम करतेय. माझा लोकांशी थेट संपर्क आहे. पाठित खंजीर खुपसण्याचे रक्त माझ्या अंगात नाही. माझ्यावर वडिलांचे संस्कार झाले आहे. विधान परिषद, राज्यसभा निवडणुका आल्यात त्यात प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येते. जेव्हा जेव्हा माझे नाव चर्चेत आले. तेव्हा मला संधी का दिली नाही हे पक्षाने सांगावे. मी कधीही पक्षाविरोधात भाष्य केले नाही. मला संधी का मिळाली नाही याचे उत्तर माझ्याकडे नाही असंही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा