शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 20:32 IST

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यावर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पलटवार केला आहे.

ठळक मुद्देनिलेश राणे यांची भास्कर जाधव यांच्यावर टीकाराष्ट्रवादीतून निवडून यायची खात्री नव्हती म्हणून शिवसेनेत उडी मारली - राणेमुलाला जि. प. अध्यक्ष केला म्हणून शिवसेनेचा पुळका - राणे

मुंबई : राज्यातील एकूणच घडामोडींवरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजप (BJP) आणि अन्य पक्ष ठाकरे सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. अशातच माजी मंत्री आणि शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यावर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपचे महाराष्ट्र सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पलटवार केला आहे. भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे. (bjp leader nilesh rane slams bhaskar jadhav over various issues)

भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. भास्कर जाधव यांनी शिवबंधन बांधले असले, तरी त्यांचे पुत्र विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी चिरंजीवांना संधी देण्यात येत आहे, असे सांगितले जात आहे. यावेळी भास्कर जाधव यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्यावर पलटवार केला. या पलटवाराला निलेश राणे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. 

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

काय म्हणाले निलेश राणे?

भास्कर जाधव विसरले ते राष्ट्रवादीत वाढले, सगळी पदे मिळून सुद्धा परत राष्ट्रवादीतून निवडून यायची खात्री नव्हती म्हणून २ वर्षा पूर्वी शिवसेनेत उडी मारली. आज मुलाला जि. प. अध्यक्ष केला म्हणून शिवसेनेचा पुळका आला नाही तर चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होता, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला आहे. 

रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे अनेकांना पचत नाहीए

काही लोकांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहिली होती. मुख्यमंत्री होता न आल्यानं त्यांनी टाहो फोडला होता. पण, त्यानंतर देखील ते मुख्यमंत्री झाले नाहीत. सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे अनेकांच्या पचनी पडत नसल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आम्हीही देत नाही आणि तुम्ही देखील देऊ नका, असा टोला भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना लगावला. 

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

मुख्यमंत्री झाला नाही, हीच भाजपला सल

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही. हीच भाजपच्या मनात सल आहे. राज्यात भाजप सरकार आले नाही, तर २०२४ मध्ये केंद्रात भाजप सरकार येणार नाही, याची भाजपला कल्पना आहे. हीच भाजपची दुखरी नस असून, याच कारणास्तव भाजपकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNilesh Raneनिलेश राणे Bhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाBJPभाजपा