शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

"भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 20:32 IST

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यावर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पलटवार केला आहे.

ठळक मुद्देनिलेश राणे यांची भास्कर जाधव यांच्यावर टीकाराष्ट्रवादीतून निवडून यायची खात्री नव्हती म्हणून शिवसेनेत उडी मारली - राणेमुलाला जि. प. अध्यक्ष केला म्हणून शिवसेनेचा पुळका - राणे

मुंबई : राज्यातील एकूणच घडामोडींवरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजप (BJP) आणि अन्य पक्ष ठाकरे सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. अशातच माजी मंत्री आणि शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यावर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपचे महाराष्ट्र सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पलटवार केला आहे. भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे. (bjp leader nilesh rane slams bhaskar jadhav over various issues)

भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. भास्कर जाधव यांनी शिवबंधन बांधले असले, तरी त्यांचे पुत्र विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी चिरंजीवांना संधी देण्यात येत आहे, असे सांगितले जात आहे. यावेळी भास्कर जाधव यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्यावर पलटवार केला. या पलटवाराला निलेश राणे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. 

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

काय म्हणाले निलेश राणे?

भास्कर जाधव विसरले ते राष्ट्रवादीत वाढले, सगळी पदे मिळून सुद्धा परत राष्ट्रवादीतून निवडून यायची खात्री नव्हती म्हणून २ वर्षा पूर्वी शिवसेनेत उडी मारली. आज मुलाला जि. प. अध्यक्ष केला म्हणून शिवसेनेचा पुळका आला नाही तर चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होता, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला आहे. 

रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे अनेकांना पचत नाहीए

काही लोकांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहिली होती. मुख्यमंत्री होता न आल्यानं त्यांनी टाहो फोडला होता. पण, त्यानंतर देखील ते मुख्यमंत्री झाले नाहीत. सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे अनेकांच्या पचनी पडत नसल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आम्हीही देत नाही आणि तुम्ही देखील देऊ नका, असा टोला भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना लगावला. 

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

मुख्यमंत्री झाला नाही, हीच भाजपला सल

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही. हीच भाजपच्या मनात सल आहे. राज्यात भाजप सरकार आले नाही, तर २०२४ मध्ये केंद्रात भाजप सरकार येणार नाही, याची भाजपला कल्पना आहे. हीच भाजपची दुखरी नस असून, याच कारणास्तव भाजपकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNilesh Raneनिलेश राणे Bhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाBJPभाजपा