शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

"पुढील वेळेस शिवसेना औषधालाही सापडणार नाही"; नारायण राणे

By देवेश फडके | Updated: January 18, 2021 16:18 IST

महाराष्ट्रातील १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागत असताना नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांचा गड मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देभाजप खासदार नारायण राणे शिवसेनेवर जोरदार टीकाग्रामपंचायत निवडणूक निकालांवर नारायण राणे यांची प्रतिक्रियाकोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे - नारायण राणे

सिंधुदुर्ग : मी पक्षात होतो म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती. कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होते, असे विधान भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागत असताना नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मी पक्षात असल्यामुळेच कोकणात शिवसेनेची ताकद होती. कोकण आणि शिवसेनेचे समीकरण केवळ माझ्यामुळे जुळून आले होते. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिलेला नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, सर्व आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही चांगली मुसंडी मारली आहे. आता पुढील वेळेस शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी बोलताना केला.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. नारायण राणे यांचा गड मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे. वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपचा झेंडा फडकला असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. तळकोकणातील शिवसेनेच्या वर्चस्वाला हा धक्का असल्याचे मानले जात आहे. 

दरम्यान, राणे कुटुंबाला धक्का देणारा अजून कोणीही जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही. जनता आमच्याबरोबर आहे, असा दावा आमदार नीतेश राणे यांनी केला. तर, विधानसभेचा राग मनात ठेवून सावंतवाडीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला योग्य ती जागा दाखवली आहे. ही पुढच्या विजयाची नांदी आहे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम राखण्यात भाजपला यश आले आहे. देवगड तालुक्यात भाजपाने १७ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. वैभववाडी तालुक्यात भाजपकडे ९ आणि शिवसेनेकडे ४ ग्रामपंचायती आल्या आहेत. मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का बसला असून, ५ ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग