शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

काम, धंदा ना व्यवसाय तरीही मर्सिडिजमधून फिरतात, मग पैसे कुठून आणतात; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 17:54 IST

दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबईत नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून उद्धव ठाकरेंवर टीका केली.

मुंबई - Narayan Rane on Uddhav Thackeray ( Marathi News ) जनता उद्धव ठाकरेंना तडीपार करेल. डोळ्यासमोर ४० आमदार गेले तू काही करू शकला नाही. त्यामुळे तडीपार होण्याची वेळ तुझ्यावर आली. उद्धव ठाकरे काय आहेत हे मला माहिती आहे. मी बोललो तर मातोश्रीबाहेर येणं मुश्किल होईल. मोदींचे कौतुक करता येत नसेल तर करू नका, पण औरंगजेबाची तुलना करतो, आम्हाला काही लीला दाखवायला लागतील. पैसे घेऊन तिकीट दिल्याची माझ्याकडे यादी आहे. नगरपालिकेत चेअरमन बनवण्यासाठी पैसे घेतले जायचे. खासदार, आमदार तिकिटासाठी पैसे घेतले जायचे. एकदिवस पत्रकार परिषद घेऊन त्या लोकांना पुढे आणतो. पैसे घेऊन पद आणि तिकीट देण्याचं काम उद्धव ठाकरेंचं आहे. मी स्वत: बाळासाहेबांना तक्रार केली होती. आम्ही डोळ्याने पैसे मोजताना पाहिले आहे. काम, धंदा ना व्यवसाय तरी मर्सिडिजमधून फिरतात, मग पैसे कुठून आणतात? दुसरं मातोश्री कुठून उभी राहिली? असं सांगत भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

मुंबईत पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना केवळ २ दिवस मंत्रालयात गेले, आता रामलीला मैदानात जातात. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतात. खासदार ५, आमदार १६ अशी व्यक्ती त्या मैदानात जावून देशाच्या पंतप्रधानावर बोलते, राजकीय उंची आणि बौद्धिकता काय? भाजपाचे ३०३ खासदार आहेत. भाजपाला तडीपार करा असं बोलतात, कोरोनात औषधाचे पैसे खाणाऱ्याला तडीपार करू. ज्यांच्यावर पेडिंग केसेस आहेत त्यांना करू. उद्धव ठाकरेंनी मानसिक स्थिती बिघडली आहे. पंतप्रधानांवर बोलण्याची पात्रता नाही. मी वैयक्तिक टीका करत नाही. खालच्या पातळीवर विषय नेत नाही. परंतु हे लोक मोदींना अरेतुरेच्या भाषेत बोलतात.  जास्त बोलाल तर ते सहन करणार नाही. रामलीला मैदानात जी सभा घेतली ती दारूण पराभव समोर दिसत आहेत त्यामुळे बोलत होते. विरोधकांच्या पराभवाची गॅरंटी म्हणून रामलीला मैदानाची सभा होती असं त्यांनी म्हटलं. 

तसेच उद्धव ठाकरेंचे ५ पेक्षा जास्त खासदार येणार नाहीत, लोकसभेनंतर संजय राऊतही दिसणार नाही. हा शरद पवारांचा प्रामाणिक माणूस आहे. शिवसेना संपण्याला संजय राऊत कारण आहेत. मोदींबाबत राऊतांनी बोलू नये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोदींचं कौतुक करतात, अनेक देशांच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक आणि प्रशंसा केली. अर्थव्यवस्थेत भारत पुढे आला आहे. देशाचा जीडीपी वाढलो. २०३० पर्यंत जगात तिसरी अर्थव्यवस्था भारताची होईल. गेल्या ९ वर्षात ५४ योजना गरिबांसाठी जाहीर केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केले? कुठला विकास आराखडा बनवला, कुठे काही योजना बनवली? उद्धव ठाकरेंसारखा बालिश माणूस पाहिला नाही. तुमचं राजकारण संपलं आहे. आता मराठी माणूस तडीपार होणार नाही तर मातोश्रीचा उद्धव ठाकरे तडीपार होण्याची वेळ आली आहे असंही राणेंनी सांगितले. 

दरम्यान, काँग्रेसच्या एका नेत्याकडे ३५० कोटी रोकड सापडली. नोटा मोजताना मशिन बंद पडली. रामलीला मैदानावर विरोधी पक्ष एकत्र जमून दु:ख व्यक्त करत होते. देशात कायदे, लोकशाही आहे. अरविंद केजरीवाल यांना का जेलमध्ये टाकले? त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे राहुल गांधी समर्थन करतात. मोदींनी गेल्या ९ वर्षात जे काम केले, भारताला जागतिक पातळीवर नाव मिळवून दिलं. त्यांच्याविरोधात बोलतात. नितीन गडकरी रस्ते बनवतात, त्याचा दर्जा तपासण्याचं काम राहुल गांधी करतात असं म्हणत नारायण राणेंनी भारत जोडो यात्रेवर टीका केली. 

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ भाजपाचाच

सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ हा भाजपाचाच, तिथे उमेदवार कोण असेल ते पक्ष ठरवेल. कुणीही लुडबूड करू नये. मी तिकीट मागितले नाही. मला न मागता भरपूर मिळालंय. भाजपाचा हा मतदारसंघ आहे. भाजपाने जर माझे नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. प्रत्येक पक्षाला बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. शिवसेनेचे किती कार्यकर्ते आहेत? भाजपाचे जिल्हा परिषद, नगरपालिका एवढी ताकद असताना तो मतदारसंघ अजिबात सोडणार नाही. विनायक राऊत हे शिवसेनेचे आहेत का? उमेदवार कोण आहे? असं म्हणत नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४