शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

Coronavirus : "पटोलेजी... प्रियंका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 15:08 IST

प्रियंका गांधींच्या तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल हे पाहावं, भाजपनं दिला सल्ला. 

ठळक मुद्देप्रियंका गांधींच्या तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल हे पाहावं, भाजपनं दिला सल्ला. प्रियंका गांधी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्रावर साधला होता निशाणा

"कोरोनाची महाराष्ट्रातील स्थिती अतिशय भयानक होत आहे. महाविकास आघाडी सरकार पुरते अपयशी ठरले आहे. स्वतः काहीच करायचे नाही आणि काहीही झाले की केंद्राच्या नावाने खडे फोडायचे, हा एकमेव उद्योग केला जात आहे. अशात  प्रियंका गांधी एक मोठी मुलाखत दिलेली आहे. काय केले पाहिजे, याचे त्यांचे ज्ञान पाहता हवे तर त्यांची मदत घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा," असा सल्ला भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांना नाना पटोले यांना दिला आहे. 

"केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन दिला, सर्वाधिक रेमडेसिवीरचा कोटा महाराष्ट्राला दिला. हा कोटा किती रुग्ण कोणत्या राज्यात ऑक्सिजनवर आहेत, हे पाहून दिलेला आहे. सुरुवातीपासून सर्वाधिक मदत मिळत असताना केवळ बोंबा करण्याचे काम वगळता महाविकास आघाडी सरकारने काहीही केलेले नाही. सर्वाधिक मदत मिळूनही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात अशीच स्थिती आहे. त्यामुळे हवे तर डॉ. मनमोहन सिंग यांनी लिहिलेल्या सर्व सूचना राज्यात अंमलात आणा, प्रियंका गांधी यांना काही दिवस राज्यात बोलवा, पण महाराष्ट्रातील स्थिती आता आटोक्यात आणली पाहिजे," असं उपाध्ये म्हणाले.

"बाकी विरोधी पक्ष म्हणून आणि केंद्रातील सरकारसुद्धा सुरूवातीपासून राजकारण न करता महाराष्ट्रासोबत आहे आणि यापुढे पण राहील. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांची चिंता तर अजिबात करू नका. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा करून आतापर्यंत अनेक बाबतीत राज्याला मदतच केली आहे आणि यापुढेही करतील. आपण प्रियंका गांधी यांच्या तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल, तेवढे फक्त पहा," असा सल्ला सुद्धा केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांना दिला आहे.काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी?

"रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली. सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली," असे प्रियंका गांधी म्हणाल्या. "लसीकरणात तुम्ही देशवासीयांना प्राधान्य का दिलं नाही? तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. कोरोनाची लस मॉरिशिअस, नेपाळला जात असल्याचे आम्ही पाहात होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लसी दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच तुटवडा जाणवत आहे," अशी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधीNana Patoleनाना पटोलेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस