शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“शिवसेनेची अवस्था काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही बिकट होईल”; गिरीश महाजनांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 09:02 IST

शिवसेना कधीच राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या प्रश्नांविषयी बोलत नाहीत, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

जळगाव: देशासह राज्यात आताच्या घडीला राज्यसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. अनेक नेते राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराज असल्याचे चित्र आहे. तर, राज्यसभा निवडणुकीत भाजप घोडेबाजार करू शकतो, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यावर भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात असून, नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. भविष्यात शिवसेनेची अवस्था काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षाही बिकट होईल, असा दावा गिरीश महाजन यांनी यावेळी केला आहे. 

शिवसेनेने शॉर्ट टर्म विचार करून मुख्यमंत्रीपद मिळवले. मात्र, यावेळी त्यांनी दीर्घकालीन राजकीय समीकरणांचा विचार केलेला नाही. शिवसेनेची जनमानसातील प्रतिम दिवसेंदिवस घसरत आहे. शिवसेना सतत किरीट सोमय्या, राणा कुटुंबीय आणि ईडी याच विषयांवर बोलत असते. या सगळ्यामुळे भविष्यात शिवसेनेची अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षाही वाईट होईल, या शब्दांत गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपचाच विजय होईल

भाजपने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. राज्यसभेची तिसरी जागा आम्ही हमखास जिंकणार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही घोडेबाजार करणार नाही. भाजपने बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली, असे संजय राऊत म्हणतात. पण आमच्याकडे बोट दाखवताना हाताची इतर चार बोटे तुमच्याकडे आहेत, हे लक्षात असू द्या. यापूर्वी शिवसेनेने राजकुमार धूत, प्रितीश नंदी, संजय निरूपम आणि प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली होती. हे कोणते निष्ठावंत शिवसैनिक होते, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.

दरम्यान, संजय राऊतांच्या टीकेचाही गिरीश महाजन यांनी समाचार घेतला. संजय राऊत हे शिवसेनेचा भोंगा आहेत. दररोज सकाळी हा भोंगा वाजतो. ते कधीच राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या प्रश्नांविषयी बोलत नाहीत, असे महाजन यांनी म्हटले. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत