शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आता कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही पण...; एकनाथ खडसेंनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 12:53 IST

मी चाळीस-बेचाळीस वर्षे भाजपामध्ये काम करत आहे. यावेळी विधान परिषदेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती.

विधान परिषदेच्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर व भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या या भूमिकेनंतर गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला आहे.

एकनाथ खडसे एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, विधान परिषदेसाठी माझे, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव दिल्लीला शिफारस करून पाठवण्यात आले आहे असे मला सांगण्यात आले होते. मात्र आता आमच्या तिघांऐवजी नवीन माणसांना संधी देण्यात आली. 

पक्षाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर माझं नाव या यादीत नसल्याचे समजले. यानंतर भाजपाच्या असंख्य कार्यकर्ते आणि नेत्यांचे मला फोन येत आहेत. भाजपामध्ये राहण्याबाबत काहीतरी निर्णय घ्या, असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. वारंवार अन्याय होत आहे, वारंवार तुम्हाला बाजूला सारलं जातंय. त्यामुळे याचा विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असा अनेक कार्यकर्त्यांचा दबाव आहे, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे इतर पक्षांकडूनही मला ऑफर येत आहे. मात्र कोरोनाच्या संकटकाळात कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही, पण कोरोनाच्या संकटानंतर आपण राजकीय निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट संकेत एकनाथ खडसेंनी दिले आहेत.

मी चाळीस-बेचाळीस वर्षे भाजपामध्ये काम करत आहे. यावेळी विधान परिषदेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने ती मिळू शकली नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्यांना संधी मिळाली असती तर मला आनंद झाला असता असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकMaharashtraमहाराष्ट्र