शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पवार साहेब मोठे नेते, त्यांच्या मनात 'ती' वेदना असेल; वर्मावर बोट ठेवत फडणवीसांचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 10:47 IST

फडणवीसांना पवारांना टोला, मुख्यमंत्र्यांना चिमटा, महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

मुंबई: मी चारवेळा मुख्यमंत्री झालो. पण मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर मला कधीच मी अजूनही मुख्यमंत्री आहे असं वाटलं नाही. देवेंद्र फडणवीसांना अजूनही तसं वाटत असेल तर चांगलंच आहे. मी पुन्हा येईनची वेदना किती खोल आहे, हे त्यातून दिसतं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काल फडणवीसांना लगावला. त्यानंतर आता फडणवीसांनी पवारांना टोला लगावला आहे.

शरद पवार साहेब खूप मोठे नेते आहेत. मोठ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं द्यायची नसतात. पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले. पण त्यांना कधीच पंतप्रधानपद मिळालं नाही याची वेदना त्यांच्या मनात असेल, असंही आपण म्हणू शकतो, अशा शब्दांत फडणवीसांनी पवारांना चिमटा काढला. राज्यात आम्हाला सत्ता मिळाली नाही ही गोष्ट खरी आहे. पण त्यामुळे आम्ही हातपाय गाळले नाहीत. विरोधी पक्ष म्हणून आमची कामगिरी उत्तम आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढला आहे. पूर, वादळात आम्ही राज्यभर फिरलो. कोविड काळात लोकांची सेवा केली. घरात बसून राहिलो नाही, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे सणसणीत टोला लगावला.

राज्यातील सध्याची परिस्थिती वाईट आहे. ज्या वेगानं भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येत आहेत, तसं याआधी कधीच घडलेलं नाही. हजारो कोटी रुपयांची दलाली सुरू आहे. त्या दलालीचे पुरावे सापडत आहेत. प्रत्येक पक्षात मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहेत. त्यानुसारच त्यांचं कामकाज सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नाहीत. लखीमपूरमधील शेतकऱ्यांबद्दल सरकारला कळवळा वाटतो. पण राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय, अशी टीका फडणवीसांनी केली.

गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या अतिशय आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. सोमय्या पुराव्यांसोबत बोलतात. त्याशिवाय ते आरोप करत नाहीत. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता १०० टक्के आहे. आरोप असलेल्या मंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत, असं फडणवीस म्हणाले. सोमय्यांनी काही वर्षांपूर्वी ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, तेच नेते आज भाजपमध्ये आहेत, त्याचं काय?, असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर विरोधकांनी याबद्दल पाठपुरावा करावा. त्यांच्या अंगावर शेकलंय म्हणून उगाच दुसऱ्यांचे विषय काढू नयेत, असा सल्ला फडणवीसांनी दिला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे