शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
6
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
7
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
8
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
9
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
10
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
11
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
12
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
13
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
14
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
15
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
16
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
17
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
18
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
19
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
20
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर

"ठाकरे सरकारने कोहळा नेऊन आवळा दिला" जाहीर केलेल्या मदतीवरून भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 18:04 IST

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज राज्य सरकारने अनुक्रमे ७५ आणि २५ कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. मात्र या मदतीवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रिवादळामुळे नुकसान झालेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज राज्य सरकारने अनुक्रमे ७५ आणि २५ कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. मात्र या मदतीवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारने दोनशे कोटींचा कोहळा घेत २५ कोटींचा आवळा दिला, असा आरोप भाजपा नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. 

आज जाहीर करण्यात आलेल्या मदतीवर टीका करताना प्रमोद जठार म्हणाले की, "ठाकरे सरकारने सिंधुदुर्गाचे हक्काचे २०० कोटी रुपये माघारी नेले आहेत. यातील १०० कोटी रुपये चांदा ते बांदा योजनेचे होते. तर १०० कोटी रुपये जिल्हा नियोजनाचे होते. हा २०० कोटी रुपयांचा कोहळा काढून घेत ठाकरे सरकारने २५ कोटींचा कोहला सिंधुदुर्गवासियांच्या हाती दिला आहे. ही मदत तुटपुंजी आहे. या तुटपुंज्या मदतीने काही होणार नाही. त्यापेक्षा जिल्ह्याचे नेलेले दोनशे कोटी रुपये परत द्या, अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या  पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले होते. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे मात्र तेथीलही आढावा घेतला जाऊन मग निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे असेही ते म्हणाले.  अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष  बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

 निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सुचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यास नुकतीच मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली होती.  

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्गPramod Jatharप्रमोद जठारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार