शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"उद्धवजी लक्ष देत नसतील तर राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावे; दोघांची वैचारिक उंची सारखीच"

By जयदीप दाभोळकर | Updated: January 11, 2021 14:11 IST

भाजपा नेत्याचा जोरदार टोला

ठळक मुद्देसामनातील अग्रलेखावरून साधला निशाणा नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा असं म्हणत शिवसेनेनं केली होती टीका

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून टीका केली होती. यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. "उद्धवजी अगदीच लक्ष देत नसतील तर संजय राऊतांनीराहुल गांधींना सल्ले द्यावेत. मोदीद्वेषाचा कॉमन फॅक्टर आहेच. शिवाय दोघांचे विचार आणि वैचारिक उंची सारखी आहे," असं म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला. "इतिहास साक्षी आहे ज्या पत्रकारांनी वैयक्तिक आकस आणि द्वेषातून मोदींचा विरोध केला, जनतेने त्यांचा बाजार उठवला. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, जनता जनार्दनाची सेवा करून तिसाऱ्यांदाही होतील," असं भातखळकर म्हणाले.  "नेहरूंनी केलेली कामे (की कांड) निस्तारण्यासाठीच जनतेने मोदींना दुसऱ्यांदा प्रचंड समर्थन देऊन पंतप्रधान बनवले. संजय राऊतांसारख्या बोरूबहद्दरांच्या मतांना मोदी किंमत देत नाहीत हे देशाचे भाग्य. नेहरूंनी जसं काश्मीरचा मुद्दा केला. चीनच्या समोर शरणागती पत्करली, तसं मोदींनी करावं असं संजय राऊतांचं म्हणणं दिसतंय. पंतप्रधान नेहरू होते म्हणून देशाच्या आरोग्य व्यवस्थेचीही वाट लागली. ७० वर्षांनंतर पंतप्रधान झाल्यावर मोदींना शौचालय बांधण्यापासून काम करावं लागलं. मुंबईत काय घडतंय महाराष्ट्रात काय होतंय याकडे पहिलं लक्ष द्या. मुंबई महानगरपालिकेत तुमची अनेक वर्ष सत्ता आहे. तिकडे ४० हून अधिक रुग्णालयं बेकायदेशीरपणे काम करतायत. ६० रुग्णालयांचं फायर ऑडिटही झालेलं नाही. त्यामुळे मोदी आणि अमित शाह यांना सल्ले देण्यापेक्षा स्वत:च्या पायाखाली काय जळतंय हे पाहा," असंही ते म्हणाले. "देवेंद्र फडणवीस हे भंडाऱ्याला गेल्यानंतर तुमच्या घरबशा मुख्यमंत्र्यांना नाईलाजानं का तिकडे जावं लागलं. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्वीट केल्यानंतर १० मिनिटांनी त्यांना ट्वीट करावंस वाटलं. त्यामुळे राज्य कारभारात लक्ष द्या आणि फुकटचे सल्ले देणं बद करा," असंही भातखळकर यांनी नमूद केलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊतAtul Bhatkalkarअतुल भातखळकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा