शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

"उद्धवजी लक्ष देत नसतील तर राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावे; दोघांची वैचारिक उंची सारखीच"

By जयदीप दाभोळकर | Updated: January 11, 2021 14:11 IST

भाजपा नेत्याचा जोरदार टोला

ठळक मुद्देसामनातील अग्रलेखावरून साधला निशाणा नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा असं म्हणत शिवसेनेनं केली होती टीका

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून टीका केली होती. यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. "उद्धवजी अगदीच लक्ष देत नसतील तर संजय राऊतांनीराहुल गांधींना सल्ले द्यावेत. मोदीद्वेषाचा कॉमन फॅक्टर आहेच. शिवाय दोघांचे विचार आणि वैचारिक उंची सारखी आहे," असं म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला. "इतिहास साक्षी आहे ज्या पत्रकारांनी वैयक्तिक आकस आणि द्वेषातून मोदींचा विरोध केला, जनतेने त्यांचा बाजार उठवला. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, जनता जनार्दनाची सेवा करून तिसाऱ्यांदाही होतील," असं भातखळकर म्हणाले.  "नेहरूंनी केलेली कामे (की कांड) निस्तारण्यासाठीच जनतेने मोदींना दुसऱ्यांदा प्रचंड समर्थन देऊन पंतप्रधान बनवले. संजय राऊतांसारख्या बोरूबहद्दरांच्या मतांना मोदी किंमत देत नाहीत हे देशाचे भाग्य. नेहरूंनी जसं काश्मीरचा मुद्दा केला. चीनच्या समोर शरणागती पत्करली, तसं मोदींनी करावं असं संजय राऊतांचं म्हणणं दिसतंय. पंतप्रधान नेहरू होते म्हणून देशाच्या आरोग्य व्यवस्थेचीही वाट लागली. ७० वर्षांनंतर पंतप्रधान झाल्यावर मोदींना शौचालय बांधण्यापासून काम करावं लागलं. मुंबईत काय घडतंय महाराष्ट्रात काय होतंय याकडे पहिलं लक्ष द्या. मुंबई महानगरपालिकेत तुमची अनेक वर्ष सत्ता आहे. तिकडे ४० हून अधिक रुग्णालयं बेकायदेशीरपणे काम करतायत. ६० रुग्णालयांचं फायर ऑडिटही झालेलं नाही. त्यामुळे मोदी आणि अमित शाह यांना सल्ले देण्यापेक्षा स्वत:च्या पायाखाली काय जळतंय हे पाहा," असंही ते म्हणाले. "देवेंद्र फडणवीस हे भंडाऱ्याला गेल्यानंतर तुमच्या घरबशा मुख्यमंत्र्यांना नाईलाजानं का तिकडे जावं लागलं. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्वीट केल्यानंतर १० मिनिटांनी त्यांना ट्वीट करावंस वाटलं. त्यामुळे राज्य कारभारात लक्ष द्या आणि फुकटचे सल्ले देणं बद करा," असंही भातखळकर यांनी नमूद केलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊतAtul Bhatkalkarअतुल भातखळकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा